मुंबई : राज्यात भाजप मनसे संभाव्य युतीची जोरदार चर्चा आहे. जि.प.परिषद आणि महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप संसार थाटण्याची शक्यताही आहे. पालघरमध्ये मनसे भाजप युतीचा नारळही फुटलाय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी काहीशी खोचक कमेंट केली. जातीयवादी पक्ष एकत्र आले तरी काँग्रेसला फरक पडणार नाही, अशा शब्दात त्यांनी संभाव्य युतीवर टीका केली.
एरवी आढेवेढे घेणारे राज्यपाल आज ठाकरेंच्या ‘या’ निर्णयावर करणार खुशी-खुशीने सही!
महापालिका आणि जि.प. परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. विविध पक्षांच्या बैठका पार पडायला सुरुवात झाली आहे. रणनिती आखायलाही सुरुवात झाली आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी नाना पटोले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खोचक भाष्य केलं. जातीयवादी पक्ष एकत्र आले तरी काँग्रेसला फरक पडणार नाही, असं ते म्हणाले. देशातील विविध राज्यात शिवसेना निवडणूक लढवत आहेत. शिवसेना हा आमचा महाराष्ट्रात मित्र पक्ष आहे. त्यांच्या पक्षाच्या निर्णयानुसार जर गोव्यामध्ये शिवसेना निवडणूक लढवत असेल तर त्यांच्या निर्णयाचे स्वागतच आहे, असंही पटोले म्हणाले.
न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना जनताच धडा शिकवेल – अमित ठाकरे
परमवीर सिंग गेल्या काही दिवसांपासून फरार आहेत. अनेक प्रयत्न करुनही त्यांचा पत्ता पोलिसांना आणि तपास अधिकाऱ्यांना कळालेला नाहीय. आमचा स्पष्ट आरोप आहे की त्यांना देशाबाहेर फरार करण्यामध्ये केंद्राचा हात आहे, असा गंभीर आरोप पटोले यांनी केला. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भाजपचे सरकार अपयशी ठरलं. या मुद्द्यांपासून भरकटवण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. परमवीर सिंग हे त्यावेळी मुंबई पोलीस कमिशनर होते त्यांना त्या काळातच कारवाई झाली असती तर हा जो घोटाळा बोलला जातोय त्याचा मूळ उद्देश काय आहे तो समोर आला असता, मात्र राजकीय द्वेषापोटी आता महाराष्ट्रावर कारवाई केली जाते. हे सरकार डळमळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
Read Also :
- मराठवाड्यातील पूरस्थितीला फडणवीस सरकारची ‘जलयुक्त शिवार’ कारणीभूत; भाजपाने मात्र दावा फेटाळला
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती मिनिटांचा दौरा करतात हे पाहावं लागेल; मनसेचा टोला
- सेल्फी विथ खड्डे… घेणाऱ्या सुप्रियाताई आता कुठे आहेत? मुंबईतील खड्यावरून विरोधक आक्रमक
- शिवसेना खासदार भावना गवळी यांनी ७ कोटींची चोरी केली; किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप
- शिवसेना नेते आनंदराव आडसुळांची तब्येत खालावली; दुसऱ्या रुग्णालयात हालवलं