मुंबई : माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन हसन मुश्रीफ यांच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार केली आहे. राज्यातील पोलिसांनी 19 सप्टेंबरला उद्धव ठाकरे यांचे माफिया म्हणून काम केलं. याची मानव अधिकार आयोगात तक्रार करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. पोलिसांचा गुंड म्हणून उपयोग करत मला घरात डांबून ठेवण्यात आलं, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
भावना गवळींवर काय आरोप केले?
शिवसेनेच्या भावना गवळी यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. “भावना गवळी यांनी स्वतः 7 कोटींची चोरी केली आहे. साडे अठरा कोटी लंपास केले. पतसंस्थांच्या बोगस इंटऱ्या करून घेतल्या आहेत. मात्र पोलिसांनी सामान्य नागरिकांच्या विरोधात तक्रार दाखल केली” असे किरीट सोमय्या म्हणाले.
राज्यपालभवन हे आता राजकीय अड्डा झालाय – नवाब मलिक
“गवळी यांनी स्वतः 7 कोटी ची चोरी केली आहे. गवळी याच्या संस्थेत बोगस नोंदी केल्या आहेत. भावना गवळी यांना अटक करावी अशी मी मागणी करत आहे. माझ्यावर झालेला हल्ला भावना गवळी आणि सईद खान यांनी केला आहे” असा आरोप सोमय्यांनी केला. “शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांना वाचविण्याचे काम सोडावे. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुख यांना लपवणे बंद करावे” असे सोमय्या म्हणाले.
हसन मुश्रीफांवर काय आरोप केला?
10 मार्च 2021 ला आदेश निघाला. मुश्रीफांनी स्वतः च्या जावयाला कंत्राट दिले. हसन मुश्रीफ यांनी 1500 कोटीचा ग्रामविकास खात्यात घोटाळा केला आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. मुश्रीफ यांनी स्वतःच्याच जावयाला अनधिकृत रित्या कंत्राट दिले आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सोमय्या यांनी केली. हसन मुश्रीफ यांची पहिली नोटीस मला मिळाली आहे पण मी घाबरत नाही, अजूनही घोटाळे बाहेर काढणार असं सोमय्या म्हणाले.
Read Also :
- शिवसेना नेते आनंदराव आडसुळांची तब्येत खालावली; दुसऱ्या रुग्णालयात हालवलं
- भाजप-मनसे युतीबाबत पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील; प्रविण दरेकरांच्या विधानाने चर्चांना उधान
- सरकारमध्ये एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहायचं असतं; त्रीस्तरीय प्रभाग रचनेवरून दादांनी टोचले कान
- शेतकऱ्यांना सर्वेतोपरी मदत करणार; पण सर्व माहिती मिळाल्यावरच, अरोदर नाही – अजित पवार
- ठरलं: ४ तारखेपासून शाळा सुरू होणार; परंतू, एका बेंचवर एकच विद्यार्थी असणार, वाचा नियमावली…