लातूर : भाजपमधील गटबाजीच्या राजकारणाला कंटाळून लातूर अहमदरपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी मंत्री विनायक पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २९ ऑक्टोंबर रोजी यशवंत चव्हाण सभागृहात शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत विनायक पाटील प्रवेश करणार आहे. परंतु विनायक पाटील यांच्या प्रवेशामुळे अहमदपुरचे राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“बबनराव ढाकणे यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातील एका मोठ्या व्यक्तीमत्वास मुकलो”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बाबासाहेब पाटील सध्या अजित पवार गटात दाखल झाले असून विनायक पाटलांच्या प्रवेशामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मतदारसंघाची रचना विनायक पाटलांची कार्यकर्त्यांची फळी आणि शरद पवार यांची मदत या त्रिसुत्री संगम करत विनायक पाटील यांनी अजित पवारांचे खंदे समर्थक बाळासाहेब पाटलांच्या विरोधात थंड थोपडले आहेत.
हेही वाचा…“आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला झोपू देणार नाही”, मनोज जरांगे पाटलांनी दिला इशारा
दरम्यान, अहमदपुर विधानसभा मतदारसंघातून विनायक पाटील हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी राज्यमंत्रीपद म्हणून काम केलं असून १९९९ साली त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवली होती अन् त्यात विजयीही झाले होते. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्रीपदाची सुत्रे हातात घेतली होती. त्यानंतर २०१४ साली अपक्ष म्हणून निवडणुक लढवली. त्यातही ते विजयी झाले. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. 2019 साली भापजने त्यांना तिकीट दिले. परंतु त्याठिकाणी भाजपच्या अतंर्गत गटबाजीचा परिणाम होऊन बाळासाहेब पाटील विजयी झाले.
हेही वाचा…“ललित पाटील प्रकरणात सुषमा अंधारेंनी दिला मोठा पुरावा,” कारवाई करण्याची केली फडणवीसांकडे मागणी
शहराध्यक्षपदी निवडणुकीत बंडखोरी केलेले उमेदवार दिलीपराव देशमुख यांची वर्णी लागली. यामुळे विनायक पाटील समर्थक गटामध्ये अस्वस्थता होती. त्यातच भापजपचे जिल्ह्यामध्ये अनेक गट तट तयार झाल्याने विनायक पाटील यांची चांगलीच कोंडी झाली. त्यामुळे सगळेच विरोधक एकत्र आल्याने त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा समाजाचा दणका..! परभणीत तब्बल १५५ उमेदवार रिंगणात, निवडणुक आयोगाने रद्द केली निवडणुक
हेही वाचा…“आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला, फडणवीसांनी मराठा, धनगर व ओबीसी समाजाला फसवले,” पटोलेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“मोदींच्या काळात भारतीयांवर १७३ लाख कोटी इतका कर्जाचा बोजा,” सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…“डायमंड उद्योग होतोय साफ, कुठं लपून बसलेत एक फुल दोन हाफ”, पटोलेंची जहरी टिका
हेही वाचा…ललित पाटील प्रकरणात नाशिकचे माजी महापौर चौकशीच्या फेऱ्यात, पोलिसांनी पाठवलं समन्स