नांदेड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच पोलीस भरती आणि स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी दिली. तसेच राज्यात पोलीस भरती झालीच पाहिजे, रिक्त झालेली पद भरलीच पाहिजे अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांनी केली. यावेळी त्याठिकाणी मोठा गोंधळ बघायला मिळाला. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचा विश्वास गमवल्यानेच त्यांच्याविरोधात तरूणांची घोषणाबाजी सुरू आहे. मराठवाड्यातील तरूणांनी बेरोजगारी व पोलीस भरती विषयी सरकारला जाब विचारत फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या वडील व मंत्री राहिलेल्या चुलतीच्या आशीर्वादाने घराणेशाहीतून राजकाऱणात स्थिरावलेल्या देवेंद्र फडणवीसांना बेरोजगारांच्या वेदना माहिती नाही म्हणून त्यांनी तरूणांना प्रतिसाद देण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज केला असा हल्लाबोल रूपाली पाटलांनी केला.
मग मोदीजींसाठी महाराष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे का ? राष्ट्रवादीचा फडणवीसांना सवाल
त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद हिसकावून घेतल्याने मुख्य उपमुख्यमंत्रीपदी पद रूचत नसल्याने देवेंद्रजी त्याचा राग महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरूणावर काढणार आहेत काय? असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. रूपाली पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख गाजरसम्राट केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, गाजरसम्राट देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासहर्ता गमावली. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही. सत्ता आल्यावर धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये एसटीचे आरक्षण देणार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला 6 हजार कोटींचे पॅकेज देणार. नाशिक विकासासाठी दत्तक घेणार. गुंतवणुकीत महाराष्ट्र एक नंबरवर घेऊन जाणार. देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात. असं रूपाली पाटलांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस खोटं आज बोलत आहेत. ते आज म्हणाले की दोन वर्षात गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला. वरील आकडेवारी ही केंद्र शासनाची आहे. त्यानुसार महाराष्ट्रात 2021 मध्ये आलेल्या गुंतवणुकीच्या मानाने गुजरात मधील गुंतवणुक 5 पट कमी आहे. असं रूपाली पाटलांनी म्हटलं आहे. त्याचसोबत रूपाली पाटलांनी देशातील विविध राज्यांतील गुंतवणुकीची आकडेवारी देखील दाखविली आहे.
Read also
- अजब सरकार..! “मंत्री करायला जर दोन महिन्यांचा काळ गेला असेल तर..;”धनंजय मुडेंची टिका
- “शिंदे-फडणवीस सरकार बेशिस्तपणे वागतात, अन् ते फक्त अजित दादांना घाबरतात”; धनंजय मुंडे
- “शिंदे साहेब आम्हाला मंत्री करतील, पण मंत्रिपद केव्हा मिळणार माहीत नाही?” बच्चू कडू
- “ताई अजून तुम्ही एवढ्या मोठ्या झाल्या नाहीत”; मनसेचा ‘त्या’ ट्विटवरून टोला
- “एक गिरणी कामगाराचा मुलगा मंत्रीपदापर्यंत पोहचला, ही लोकशाहीची खासियत”; चंद्रकांत पाटील