मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आम्हाला मंत्री करतील. त्यामुळं त्याची चिंता करायची आवश्यकता नाही. पण, मंत्रिपद केव्हा मिळणार? हे सांगू शकत नाही. तो माझ्या आटोक्याबाहेरचा विषय आहे. आमच्यासाठी मंत्री पद हा फार मोठा विषय नाही. आमच्या कामात मंत्रिपदाची ताकद आहे, तरीसुद्धा आम्ही मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही तो आमचा अधिकार आहे. असं मत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे.
“सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या फडणवीसांना तरूणांच्या व्यथा काय समजणार”?; रूपाली पाटलांचा सवाल
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अलिकडेच करण्यात आला. पहिल्या मंत्रिमंडळात शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 असे 18 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु यामध्ये एकाही अपक्ष आणि महिलांना मंत्रिपदासाठी संधी देण्यात आली नाही. त्यावरून त्यानंतर बच्चू कडू नाराज असल्याच्या बातम्या देखील समोर येत होत्या. तसेच दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये बच्चू कडूंनी संधी देण्यात येईल. असं शिंदे आणि भाजपने स्पष्ट केलं आहे.
उत्तराखंडमधील अजस्त्र काला नाग पर्वतावर चढाई ; ‘लेक वाचवा’चा दिला संदेश
शिंदे सरकारमध्ये सध्या 20 मंत्री आहेत. मात्र यापैकी अनेक मंत्र्यांनी आपल्या पदाचा कारभार देखील स्विकारला नाही. यावरून विरोधक त्यांच्यावर प्रखरपणे टिका देखील करीत आहेत. यातच पालकमंत्र्यांची देखील निवड करण्यात आली नाही. यावरून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावला आहे.
“मराठवाडा मुक्तिसंग्रामचा कार्यक्रम शिंदेंनी 15 मिनिटांत उरकला, अन् शिंदे-सेनेत वाद पेटला”
मंत्रीमंळ विस्तार होऊन इतके दिवस झाले तरीही त्यांना अजून पालकमंत्री निवडता आले नाहीत. कारण नवीन सरकारमधील काही मंत्री नाराज आहेत म्हणून त्यांनी अद्याप मंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली नाहीत. त्यांना जो विभाग मिळाला आहे, म्हणून नाराज झाले आहेत, असं हे अजब सरकार आहे. मंत्री करायला जर दोन महिन्यांचा काळ गेला असेल आणि अद्याप पालकमंत्री मिळाले नसतील तर तुमचा-आमचा विकास येणाऱ्या किती दिवसात होईल? याचा हिशोब लावा. शुन्याची ज्यांनी निर्मिती केली त्यांनाही हिशोब लावता येणार नाही. 120 आमदार असूनही उपमुख्यमंत्रीपदावर भाजपला समाधान मानावं लागलं, मग नवं सरकार आणून भाजपला फायदा काय झाला? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
Read also
- “ताई अजून तुम्ही एवढ्या मोठ्या झाल्या नाहीत”; मनसेचा ‘त्या’ ट्विटवरून टोला
- “एक गिरणी कामगाराचा मुलगा मंत्रीपदापर्यंत पोहचला, ही लोकशाहीची खासियत”; चंद्रकांत पाटील
- खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे..! फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेलेल्या प्रकल्पांची यादीच राष्ट्रवादीने केली जाहीर
- मग मोदीजींसाठी महाराष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे का ? राष्ट्रवादीचा फडणवीसांना सवाल
- “अजूनही वेळ गेलेली नाही”; मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमांबाबत मुख्यमंत्र्यांवर अजित पवारांचा संताप