बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित आज औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित आज हैदराबाद येथे महाराष्ट्रा, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या मिळून मुक्तिसंग्रामचा एक संयुक्त कार्यक्रम आयोजिक करण्यात आल्याने शिंदे लगेच निघून गेले. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
“मग यंदाच्या भाऊबीजेला भावाला ओवाळून या, बघा वेदांत परत मिळतोय का? राष्ट्रवादीचा फडणवीसांना सवाल
सरकारने मराठवाडा मुक्तीसंग्रामात लाभलेले वडीलधाऱ्यांचे योगदान याबाबतची माहिती नव्या पिढीला द्यावी. या अनुषंगाने राज्य सरकारने काही कार्यक्रम घ्यायला हवे होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद येथे झेंडावंदन करून ते हैदराबादला निघून गेले. वास्तविक हैदराबादला मोठा कार्यक्रम घेण्यापेक्षा मुंबई अथवा औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त एखादा कार्यक्रम घेणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही, अशी नाराजी विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी राज्य सरकारवर व्यक्त केली. बीड येथे विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी प्रसार माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला.
“पांढऱ्या पावलांच सरकार आलं अन् प्रकल्प गुजरातला गेला”; मनिषा कांयदे
पुढे अजितदादा म्हणाले की, ज्याप्रमाणे देशाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना जो सहभाग जनतेने घेतला, त्या पद्धतीचा कार्यक्रम मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारलाही घेता आला असता, त्याकरिता राज्य सरकारने उपसमिती स्थापन केली होती. मात्र दुर्दैवाने आताच्या राज्यकर्त्यांकडून ज्या पद्धतीने लक्ष देण्याची गरज आहे त्या पद्धतीने लक्ष दिले जात नाही, अशी टीका अजित पवारांनी केली. तसेच अजूनही वेळ गेलेली नाही. मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने राज्यकर्त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठवाड्यातील जनतेच्या मागण्या लक्षात घेऊन उर्वरीत दिवसात त्या प्रमाणे काम करावे, अशी आग्रही मागणी अजित पवारांनी केली.
“वेदांता प्रकल्पासाठी BMC ने किती रेटने मागणी केली होती”; शेलारांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
दरम्यान, औरंगाबाद येथील कार्यक्रम सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला होता. परंतु एकनाथ शिंदेंनी सकाळी सात वाजताच औरंगाबादमधील ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेतला. केवळ 15 मिनिटांत सर्व कार्यक्रम आटोपून शिंदे हैदराबादला रवाना झाले. त्यानंतर आता शिंदे गट आणि शिवसेनेच्या वादाला सुरूवात झाली आहे. तसेच चंद्रकांत खैरे यांच्यासह सेनेच्या इतर नेत्यांनी परत सिद्धार्थ उद्यान येथे जाऊन मराठवाडा मुक्तीसंग्राम स्तंभास अभिवादन केलं.
Read also
- “सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या फडणवीसांना तरूणांच्या व्यथा काय समजणार”?; रूपाली पाटलांचा सवाल
- उत्तराखंडमधील अजस्त्र काला नाग पर्वतावर चढाई ; ‘लेक वाचवा’चा दिला संदेश
- “मराठवाडा मुक्तिसंग्रामचा कार्यक्रम शिंदेंनी 15 मिनिटांत उरकला, अन् शिंदे-सेनेत वाद पेटला”
- “रझाकार अन् सजाकारांचा बंदोबस्त मनसे करणार”; राज ठाकरेंचं औरंगाबादच्या ‘मुक्ति’संग्रामाचं पत्र
- “गाजरसम्राट देवेंद्र फडणवीसांनी विश्वासहर्ता गमावली”; रूपाली पाटलांचा हल्लाबोल