मुंबई : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजपचे मुंबई शहाराध्यक्ष आशिष शेलार यांनी थेट आता उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वेदांता- फॉक्सकॉनचा दीड कोटींचा प्रकल्प होता, मग इथे किती टक्के मागितले होते? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. त्यावर शिवसेनेच्या आमदार मनिषा कांयदे यांनी आशिष शेलारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“आता बाळासाहेब हयात असते तर शिंदेंची बिन पाण्याने केली असती”; अजित पवारांची टोलेबाजी
आशिष शेलार यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, वेदांता फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प होता, मग इथे किती टक्के मागितले होते? 10 टक्के नुसारच हिशोब मागितला जात होता की महापालिकेतील रेटने मागणी होत होती? सब गोलमाल है..! चौकशी झाली पाहिजे, असं देखील आशिष शेलारांना म्हटलं आहे. तसेच जनतेसमोर सत्य यायलायच हवे. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात उद्योगांना असलेल्या वीज आणि विविध सवलती आणि अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी 10 टक्के लाच द्यावी लागत होती. इतका भ्रष्टाचार बोकाळला होता. असा गोप्सस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी देखील केला आहे.
“आता मुख्यमंत्र्यांचा आवाज BJP अन् ED ने म्युट केलाय”; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही शिकवणच त्यांना त्यांच्या नेत्यांनी दिली आहे. टक्केवारी, सरासरी या गोष्टी त्यांच्या मनात येतात कुठून? असा सवाल देखील मनिषा कायंदे यांनी केला आहे. पांढऱ्या पावलांच सरकार आलं आणि हा प्रकल्प गुजरातला गेला. असं देखील मनिषा कांयदे यांनी म्हटलं आहे.
“उद्धव ठाकरेंच्या पापामुळे वेदांत कंपनी गुजरातला गेली”; नारायण राणेंची टिका
गुजरात हा आपल्या देशातीलच एक भाग आहे. परंतु महाराष्ट्रातील राजकीय नेते आपल्या भल्यासाठी निवडून आले आहेत. ती जबाबदारी त्यांनी स्विकारली पाहिजे आणि त्यांची माफी मागितली पाहिजे. उगाचच खोटं नाटं सांगून ठाकरे सरकार आणि महाविकास आघाडी सरकारमुळेच हा प्रकल्प गेला असं सांगत असून ते खोटं आहे. असंही त्या म्हणाल्या.
Read also
- “वेदांता प्रकल्पासाठी BMC ने किती रेटने मागणी केली होती”; शेलारांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
- “बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यास धाडस लागतं”; उदय सामंतांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं
- “भाजपने मुंबई महापालिकेत उपमहापौर पद द्यावं”; रामदास आठवलेंची आता नवी मागणी
- “मंत्र्यांनी बंगले घेतले, पद घेतली, पण महाराष्ट्रात पालकमंत्री कुठं आहेत”? आदित्य ठाकरेंचा सवाल
- पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचं चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्घाटन…! स्थानिक नेत्यांचं मोलाचं योगदान