रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसला आहे. अनेक खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन गद्दार म्हणून जोरदार हल्ला त्यांच्यावर चढवत आहे. अनेकदा बंडखोर आमदारांचा उल्लेख ते गद्दार म्हणूनच करताना दिसत आहेत. त्यावर आता आदित्य ठाकरे यांना बंडखोर आमदारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“उद्धव ठाकरेंच्या पापामुळे वेदांत कंपनी गुजरातला गेली”; नारायण राणेंची टिका
अलिकडेच आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी येथे जाहीर सभा घेतली. त्या सभेत त्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. त्यानंतर उदय सांमत यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, आमच्या मतदारसंघात येऊन आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ठरवले हे योग्य की अयोग्य ते सांगावे. काॅंग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जाऊ नये हा बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारे पन्नास जण गद्दार कसे. ह्याला धाडस म्हणतात. असं म्हणत उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावलं आहे.
“गद्दार संजय गायकवाडांनी कुणावर काही बोलणं म्हणजे एक प्रकारे विनोदच”; शिवसैनिकांचा हल्लाबोल
तसेच शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी देखील आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, जनतेच्या भावनांवर राज्य करण्याची वेळ आता निघून गेली आहे. तो एक काळ होता, जनतेच्या भावना भडकावून तुम्ही राज्य करायचा. आता पीढी बदललीय, या पीढीला स्वत:च हित कळतं. मंत्री म्हणून तुम्ही तुमची कामगिरी सांगत सगळीकडे फिरा. जल्लोष कोणीही दाखवू शकतो. जल्लोष आणि मतदान यामध्ये मोठा फरक असतो. त्यामुळे तुम्ही मंत्री असताना काय केलं? हे तुम्ही सांगितलं पाहिजे. गद्दार, खोके हे सांगण्यासाठी लीडरशीप नसते. लीडरशीप ही राज्याच्या विकास करण्यासाठी असते असं दिपक केसरकर म्हणाले.
Read also
- “भाजपने मुंबई महापालिकेत उपमहापौर पद द्यावं”; रामदास आठवलेंची आता नवी मागणी
- “मंत्र्यांनी बंगले घेतले, पद घेतली, पण महाराष्ट्रात पालकमंत्री कुठं आहेत”? आदित्य ठाकरेंचा सवाल
- पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचं चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्घाटन…! स्थानिक नेत्यांचं मोलाचं योगदान
- “आता बाळासाहेब हयात असते तर शिंदेंची बिन पाण्याने केली असती”; अजित पवारांची टोलेबाजी
- “आता मुख्यमंत्र्यांचा आवाज BJP अन् ED ने म्युट केलाय”; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल