पुणे : वेदांत फॉक्सकॉन कंपनी गुजरातला गेल्याने जवळपास 1 लाख 66 लाख हजार कोटी रूपयांची गुंतवणुकीचं नुकसान झाल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गरळ ओकली आहे. मात्र यापेक्षा मोठा महाराष्ट्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासाठी देणार असल्याचं भाजपचे नेते सांगत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“आढळरावांचे आरोप म्हणजे राजकीय वैचारिक दारिद्याचं लक्षण”; अमोल कोल्हे
या प्रकल्पात जवळपास एक लाख कोटी रूपयांची कोटी रूपयांची गुंतवणुक असलेेले डिस्प्ले फॅब्रिकेशन, 63 हजार कोटी रूपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टरर्स तसेच 3800 कोटी रूपयांचा चाचणी प्रकल्पाचा देखील समावेश आहे. परंतु हा प्रकल्प आता गुजरातला गेला आहे. यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, प्रत्येकी 50 खोक्यांच्या मोबदल्यात 40 जणांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलंय. महाराष्ट्रातील दोन लाख तरूणांची स्वप्न त्या मोबदल्यात बेचिराख केली. फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातला पळवल्यावरून मुख्यमंत्री ब्र काढत नाहीत. यांचे आवाज बीजेपी आणि इडीने म्युट केले आहे. अशी खोचक टिप्पणी अंधारे यांनी केली आहे.
“महाराष्ट्रात साधू सुरक्षित नसतील तर हिंदुत्वाचे सरकार कसे”? जयंत पाटलांचा सवाल
राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला स्थलांतरित करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. या निर्णयामुळे राज्यातील लाखो तरूणांच्या रोजगारावर गदा आली आहे. याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने येत्या २० सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाची सुरुवात आज मुंबई येथून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या पुढाकाराने करण्यात आली. यावेळी पन्नास खोके-माजलेत बोके, ढोकळा ना फापडो- वेदांता प्रोजेक्ट आपलो, महाराष्ट्राला धोके – सीएमला खोके, ईडी सरकारचा धिक्कार असो अशा राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
“शिवसैनिकांचा हात काॅंग्रेसकडे जाणार नाही, ज्यांचा गेला तो बाळासाहेबांचा औलादच नाही”; संजय गायकवाड
दरम्यान वेदांत प्रकल्पावरून राज्यात विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी आणि युवासेनेच्या वतीने शिंदे सरकारविरोधात आज ठिकठिकाणी जोरदार घोषणाबाजी देण्यात आली आहे. यावरून राज्यतील राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहे. अशातच यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरू सवांद साधला असल्याचं बोलण्यात येत आहे.
Read also
- “उद्धव ठाकरेंच्या पापामुळे वेदांत कंपनी गुजरातला गेली”; नारायण राणेंची टिका
- “गद्दार संजय गायकवाडांनी कुणावर काही बोलणं म्हणजे एक प्रकारे विनोदच”; शिवसैनिकांचा हल्लाबोल
- “किरीट भाई आत्ता गप्प का ? तुमचा आवाज बसला आहे की बसवला गेला ?” राष्ट्रवादीचा सवाल
- “फडणवीसांना न विचारता निर्णय जाहीर केला, म्हणून कृषीमंत्र्यांना पुन्हा झापणार”
- “शेतकऱ्यांची मुलं शेती करणार, आता पाचवीपासून शेतीचे धडे”?; कृषी मंत्र्यांची घोषणा