पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. परंतु यामध्ये एक विधान करण्यात आलं आहे. ही नक्कीच आनंदाची बाब आहे. परंतु शिवाजीराव आढळराव यांनी असं विधान केलं की, मालिकेच्या दृष्टिकोनातून अमोल कोल्हे यांनी त्यामध्ये स्वराज्य रक्षक हे नाव घुसडण्याचा प्रयत्न केला आहे. हे चुक आहे. असा आरोप करणं हे राजकीय वैचारिक दारिद्याचं लक्षण आहे असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
“..तर निवृत्त न्यायधिशांमार्फत चौकशी करा”; आशिष शेलारांचा मागणी
इतिहासाचा व्यवस्थित धुंडाळा घेतला तर स्वराज्य रक्षक ही बिरूदावली संभाजी महाराजांची राहिली आहे. जेव्हा आपण राष्ट्र प्रथम ही संकल्पना मानतो. यामध्ये अगोदर राष्ट्र येतो मग धर्म येतो. अशाप्रकार स्वराज्य रक्षक संभाजी महाराज ही भूमिका इतरांपेक्षा व्यापक आहे. तसेच स्वराज्य रक्षक संभाजी महाराज ही मालिका 2020 मध्येच संपली आहे. त्यानंतर ह्या मालिकेच्या प्रमोशनसाठी मी करीत आहे असं म्हणणं हे वैचारीक दारिद्याचं लक्षण आहे असंही कोल्हे म्हणाले.
“नाणार, जैतापूर, बुलेट ट्रेन, मेट्रो कारशेड रखडवणारा गद्दार कोण?”; भाजपचा शिवसेनेला सवाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरूर मतदार संघातील विविध अधिकारी वर्गाची बैठक घेतली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्दशानात मी या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करीत आहे की, ते लोकशाहीचा नवीन पायंडा पाडण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न आहे. त्या बैठकीला आमदार आणि तसेच मला देखील बैठकीचं निमंत्रण नव्हतं. त्यामुळे शिरूर मतदार संघातील लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला निमंत्रण नसल्याचं हा लोकशाहीचा अवमान असल्य़ाचं मला खेदपुर्ण म्हणावं लागतं आहे. हा लोकशाहीचा दुर्दैवी पायंडा आहे. असंही ते म्हणाले.
Read also
- “महाराष्ट्रात साधू सुरक्षित नसतील तर हिंदुत्वाचे सरकार कसे”? जयंत पाटलांचा सवाल
- “शिवसैनिकांचा हात काॅंग्रेसकडे जाणार नाही, ज्यांचा गेला तो बाळासाहेबांचा औलादच नाही”; संजय गायकवाड
- “आधी ‘ईडी-पीडा’ टळावी, यासाठी अग्नी पेटवा, खिचडी आपोआप शिजत जाईल”
- ” याद राखा…! अगोदर चाबकाचे फटके मग कायद्याचे फटके मिळतील”; रूपाली पाटलांचा सज्जड दम
- “केंद्र आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावत आहेत का?”; नाना पटोले