मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या यशाचे श्रेय विरोधकांचे जे विखुरलेपण आहे, त्या बेकीस द्यायला हवे. विरोधक एकीची वगैरे भाषा बोलतात, पण ते योग्य वेळी जणू ठरवून एकमेकांचा हात सोडतात. “नितीश कुमार, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन वगैरे आम्ही एकत्रच असल्याचे ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले, पण ही एकीची भाषा शेवटपर्यंत टिकेल काय? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीबाबत विरोधकांचं एकमत असल्याचं याठिकाणी स्पष्ट नसल्याचं दिसत आहे.
“भगवान गडावर दसरा मेळावा घेणारच, करूणा मुंडे ठाम”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा
दिल्ली व पंजाबात केजरीवाल यांचा ‘आप’ भाजपविरोधी आहे, पण त्यांचा घोडा नेहमीच वेगळ्या दिशेने जातो. शरद पवार हे देशाच्या राजकारणातले सध्याचे पुराणपुरुष आहेत. लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने आपले राज्य सांभाळले तरी पुरे. आघाडीचे नेतृत्व कोणी करावे? पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? वगैरे नंतर पाहता येईल. आधी ‘ईडी-पीडा’ टळावी यासाठी अग्नी पेटवा, खिचडी आपोआप शिजत जाईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र लढली, तर लोकसभेत ३५ जागा जिंकण्याचा विश्वास आहे. असा देखील उल्लेख सामानातून करण्यात आला आहे.
“अटक करावी, नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी माफी मागावी”
नरेंद्र मोदी यांची 2014 ला आलेली लाट 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देखील प्रखरपणे जाणवली. त्यामुळेच या निवडणुकीत 2014 पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकल्या आणि एकहाती सत्ता मिळवली. 2014 च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदींनी देशात विकासकामांच धडका लावला. अनेक गोष्टी नरेंद्र मोदींनी साध्य केल्या. यामध्ये धार्मिकेत्या अधिक होत्या. त्यात काही शंका नाही. परंतु 2019 च्या निवडणुकांनंतर नरेंद्र मोदींची प्रसिद्धी दिलेले आश्वासन पुर्ण न करू शकल्यामुळे काहींसी कमी होताना दिसली.
आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा देशात सत्ता मिळवण्यासाठी नरेंद्र मोदी जोरदार तयारी करताना दिसत आहेत. यातच केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राज्यात भाजपविरोधी सत्ता पाडण्याचा देखील भाजपने प्रयत्न केले असल्याचा आरोप विरोधी पक्ष करताना दिसत आहेत. देशात अनेक राज्यातील सत्ता भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून पाडली असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा कस लागण्याची शक्यता आहे.
Read also
- ” याद राखा…! अगोदर चाबकाचे फटके मग कायद्याचे फटके मिळतील”; रूपाली पाटलांचा सज्जड दम
- “केंद्र आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावत आहेत का?”; नाना पटोले
- “..तर निवृत्त न्यायधिशांमार्फत चौकशी करा”; आशिष शेलारांचा मागणी
- “नाणार, जैतापूर, बुलेट ट्रेन, मेट्रो कारशेड रखडवणारा गद्दार कोण?”; भाजपचा शिवसेनेला सवाल
- “भविष्यातील मोठ्या प्रकल्पाचं निव्वळ चॉकलेट देऊ नका”; अशोक चव्हाण भाजपवर संतापले