सोलापुर : ज्या राज्यात भाजपची सत्ता म्हणजे देवेंद्र फडणवीस उपमुख्यीमंत्री आहेत. त्या राज्यातून एखादा प्रकल्प गुजरातला जाणं हे फार महत्वाचं मानत नाही. उकाईच्या धरणातील पाणी मराठवाडा, जळगाव, धुळ्याच्या काही भागात जाणारं पाणी गुजरातला गेलं आहे. असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून ज्यादिवशी देेवेंद्र फडणवीस सत्तेत आले तेव्हापासून जात असल्याचं आम्ही गृहीत धरलं असल्याची टिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
“मुख्यमंत्री असताना मोदींनी अनेक प्रकल्प घोषीत करून हजारो करोड रूपये पाण्यात घातले”
नवीन औद्योगिकरण धोरण याची चर्चा न केल्यामुळे महाराष्ट्रातील क्षमता सध्या कोणीही लक्षात घेताना दिसत नाही. राज्यातील विविध जिल्हांत साखरेचे कारखाने सोडले तर बाकीचे उद्योग किती होणार त्याकडे लक्ष द्यायलं हवं. वेदांत प्रकल्पसाठी मागच्या सरकार जबाबदार असून या सरकारने ते वाचवलं नाही म्हणून ते देखील जबाबरदार आहे.असंही ते म्हणाले.
दिपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर?; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधान
कुठलंही राज्य एखादा प्रोजेक्ट पळवणं हे दुमत नाही. त्यात प्रत्येक राज्याला स्व: चा विकास करायचा असतो. तामिळनाडू राज्यानं एकही औद्योगिक प्रकल्प बाहेर जावू दिलं नाही. राज्य सरकारचं डोकं फक्त साखरेच्या खोक्यामध्ये अडकलं आहे. महाराष्ट्र हा काही बिहार सारखं एका प्रोजक्टवर अवलंबून नाही आहे. त्यासाठी प्रत्येकामध्ये कल्पकता पाहिजे. तसेच साखरेच्या बाहेर महाराष्ट्राचा कसा विकास होऊ शकतो? याचा विचार केला पाहिजे.
“त्या वेळी बहुदा जंयत पाटील अंतराळात फिरायला गेले होते” ; भाजप आमदाराचा टोला
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी थेट राष्ट्रवादीवर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी महाराष्ट्रात साखर उद्योगपलीकडे कधी गेलीच नाही. दिल्लीत ज्यावेळी खासदार महाराष्ट्राच्या चर्चेसाठी एकत्र येत होते त्यावेळी त्यामध्ये शरद पवार नसायचे असा आरोप देखील त्यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.
Read also
- “पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?”खडसेंचा शिंदेंना खोचक टोला
- “सुप्रिया सुळेंना सत्ता गेल्याचं दु:ख झालं आहे”; सुधिर मुनगंटीवारांचं सुळेंना प्रत्युत्तर
- उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का..; देशातील 12 सेनेच्या राज्यप्रमुखांचा शिंदेंना पाठिंबा
- “केवळ त्यांच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही, म्हणुन हिणवलं जातंय”; आशिष शेलार
- “महाराष्ट्रातील वारकरी संप्रादयात घुसखोरी; काळजी नको मी प्रयत्न करेन”; शरद पवार