जळगाव : राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. राज्यात झालेले फेरबदल जनतेला फार काही आवडलेले नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं घाणेरडं राजकारण कधी झालं नव्हतं. खोक्यांची भाषा कधी झाली नव्हती. निवडणुका विचाराने लढल्या जायच्या. परंतु अलीकडे हे सरकार पाडायचं, ते पाडायचं हेच चाललं आहे. असं परखड मत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी केलं आहे.
दिपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर?; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधान
आपल्या जिल्ह्यातील 5 आमदार शिंदेंच्या गटात गेले. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना वाढवली, घडवली. धनुष्यबाणाच्या जोरावर, बाळासाहेबांच्या पुण्याईवर तुम्ही निवडून आलात आणि त्यांच्याशी धोका देऊन दुसरीकडे गेलात हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. राज्यातील जनता तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले.
“त्या वेळी बहुदा जंयत पाटील अंतराळात फिरायला गेले होते” ; भाजप आमदाराचा टोला
तुम्ही 200 कोटीचं काय 600 कोटी आणले असतील पण तत्व आणि सत्व शिल्लक राहिले नाही. पण निष्ठा शिल्लक नसेल तर 200 कोटी आणले काय आणि 600 कोटी आणले, त्याला काय अर्थ आहे? पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा? असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवर टिकास्त्र सोडलं आहे. तसेच आपल्याला हा मतदारसंघ जिंकायचा आहे हा दृष्टीने काम करायचं आहे. हा मतदारसंघ पिंजून काढायचा आहे असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
“तेव्हा राजसाहेबांनी मित्रांनाच काय पण भावाला पण सोडलं नाही”; मनसे नेते संदीप देशपांडे
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत युती करीत सत्ता स्थापन केली. यातच आता उद्धव ठाकरे आणि शिंदे सरकारची राजकीय लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.
Read also
- “सुप्रिया सुळेंना सत्ता गेल्याचं दु:ख झालं आहे”; सुधिर मुनगंटीवारांचं सुळेंना प्रत्युत्तर
- उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का..; देशातील 12 सेनेच्या राज्यप्रमुखांचा शिंदेंना पाठिंबा
- “केवळ त्यांच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही, म्हणुन हिणवलं जातंय”; आशिष शेलार
- “महाराष्ट्रातील वारकरी संप्रादयात घुसखोरी; काळजी नको मी प्रयत्न करेन”; शरद पवार
- “मुख्यमंत्री असताना मोदींनी अनेक प्रकल्प घोषीत करून हजारो करोड रूपये पाण्यात घातले”