नागपुर : वेदांत प्रकल्पावरून राज्यात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये फैरी सुरू झाल्या आहेत. यातच राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना करावं, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याला आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“त्या वेळी बहुदा जंयत पाटील अंतराळात फिरायला गेले होते” ; भाजप आमदाराचा टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्रात सरकार आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना याचं दु:ख वाटत आहे. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावरून दिसत आहे की त्यांना सत्ता गेल्याचं खुपच दु:ख झालं आहे. हे त्याचं सत्ता गेल्याचं लक्षण आहे, असा टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीच्या खसदार सुप्रिया सुळे यांना लगावाल आहे.
“तेव्हा राजसाहेबांनी मित्रांनाच काय पण भावाला पण सोडलं नाही”; मनसे नेते संदीप देशपांडे
महाराष्ट्रातील सरकार हे केंद्राचं आणि गुजरातचं हस्तक आहे असं आरोप नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला होता. यावरून राज्यातील कोणतेही मुद्दे बोलण्यासाठी त्यांच्याकडे राहिलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या संदर्भातील मुद्दे त्यांच्याकडे राहिलेले नाहीत, कारण नियमित कर्ज भरणाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने 50 हजार देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात 75 वर्षावरील नागरिकांना सर्व शिवनेरी पासुन ते आरामदायी गाडीपर्यंत सुट या सरकारने दिली आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवला. राज्यामध्ये शिंदे आणि फडणवीस याचे हे सरकार ज्या प्रकारे काम करत आहे. त्यामुळे असेच मुद्दे यांच्याकडे राहिलेले आहेत, असं प्रत्युत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी नाना पटोलेंना दिलं आहे.
Read also
- उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का..; देशातील 12 सेनेच्या राज्यप्रमुखांचा शिंदेंना पाठिंबा
- “केवळ त्यांच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही, म्हणुन हिणवलं जातंय”; आशिष शेलार
- “महाराष्ट्रातील वारकरी संप्रादयात घुसखोरी; काळजी नको मी प्रयत्न करेन”; शरद पवार
- “मुख्यमंत्री असताना मोदींनी अनेक प्रकल्प घोषीत करून हजारो करोड रूपये पाण्यात घातले”
- दिपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर?; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधान