सांगली : उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील चौघे साधू कर्नाटकला देवदर्शनासाठी आले. त्यानंतर ते विजापुरवरून जत तालुक्यातल्या लवंगामार्गे पंढरपुरला जात असताना सांगलत त्यांना मारहाण कऱण्यात आली. मुलं चोरणारी टोळी समजून त्यांना जमावाने चांगलीच मारहाण केली. त्यावरून आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. यावरून राष्ट्रवादीचे आमदार जंयत पाटलांना भाजप नेते अतुल भातखळकारांनी चांगलाल टोला हाणला आहे.
“रशियावरून फडणवींसांचा फोन आला अन्…मला सांगितलं की..”; सांमंताचं वेदांत प्रकल्पावर मोठं वक्तव्य
हिंदुत्वावादी म्हणून सत्तेत आलेल्या शिंदे आणि भाजपच्या राज्य सरकारच्या काळात साधू सुरक्षित नाहीत. सांधूना मारहाण करणे अयोग्य असून मारहाण करणे चूकीचे आहे. असं जंयत पाटलांनी म्हटलं आहे. त्यावर पालघर साधू हत्याकांडाच्या वेळी बहुदा जंयत पाटील अंतराळात फिरायला गेले होते. त्यांना ती घटना माहितीच नसावी असा टोला भातखळकारांनी हाणला आहे.
“देवाचा कौल घेऊन भाजपात प्रवेश केला”; गोव्यातील काॅंग्रेस आमदाराचं वक्तव्य
दरम्यान, पंढरपुरकडे जाण्याचा रस्ता विचारले असता तरूणाला मुलं चोरणारी टोळी असल्याचा सांधूवर संशय आला. त्यानंतर त्या तरूणांनी ही सर्व माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर संपप्त ग्रामस्थांनी सांधूना गाडीतून बाहेर काढू बेदम मारहाण केली. त्यांना लाठी काठी आणि पट्ट्याने जबर मारहाण करण्यात आली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Read also
- “तेव्हा राजसाहेबांनी मित्रांनाच काय पण भावाला पण सोडलं नाही”; मनसे नेते संदीप देशपांडे
- “उद्योगमंत्र्यांचा तरूणांनी राजीनामा मागितला पाहिजे”; वरूण देसाई
- “पहिल्याच अधिवेशनात दिलेले वचन मुख्यमंत्री पूर्ण करत नसतील तर..;” राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- “वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यामागे मोदी नाहीत”; वेदांतच्या अध्यक्षांचे स्पष्टिकरण
- “शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार, जर परवानगी मिळाली नाही तर..;”गुलाबराव पाटील