मुंबई : मला काल रशियावरुन देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितले की, फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून का गेला?, हे सांगण्यात आता अर्थ नाही. त्यापेक्षा लोकांना नेमका घटनाक्रम आणि आकडेवारी सांगा, असे देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितले, असं वक्तव्य उद्योगमंत्री उद्य सामंत यांनी वेदांत प्रकल्पावर केलं आहे.
“माझी अक्कल काढली, तरी मला फारसं वाईट वाटत नाही”; पेडणेकरांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर
फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्पासाठीची हायपॉवर कमिटीची बैठक ही शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर म्हणजे १५ जुलै रोजी झाली. तोपर्यंत काहीच ठोस घडले नव्हते. नुसती चर्चा करून किंवा भेटी घेऊन उद्योग राज्यात येत नाहीत. आपण फॉक्सकॉन-वेदांता कंपनीला महाराष्ट्रात नक्की काय देणार आहोत? तळेगावच्या जागेत काय करसवलती असतील?, या प्रकल्पासाठी जास्त पाणी कशाप्रकारे उपलब्ध करुन देता येईल?, हे सगळे महत्त्वाचे निर्णय १५ जुलै रोजी झाले, असं उद्य सामंत म्हणाले.
सेनेची जागा आता भाजप घेणार..! रिक्त झालेल्या जागेवर भाजपचा दावा, सेना-भाजपमध्ये रस्सीखेस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येऊन फक्त दोन महिने झाले आहेत. वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्याचं खापर आमच्यावर फोडू नका. सगळं जे वाईट होतंय, ते आमच्यामुळे आणि चांगलं घडतंय ते तुमच्यामुळे असं नसतं. मात्र मागील सात महिन्यांतील महाराष्ट्र सरकारच्या धोरणामुळे हे अपयश आलं आहे, असंही मंत्री उद्य सामंत म्हणाले.
सोबतच, रिफआयनरीचं काय करणार आहात? राजापूर रिफायनरीला विरोध करण्याचं खासदारांना सांगायचं.. आमदार समर्थन करत असताना हा दुटप्पीपणा ठेवायचा. म्हणून काल शिंदे साहेबांनी मोदी साहेबांशी चर्चा केल्याची माहिती उद्य सामंत यांनी दिली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी भविष्यात याच तोडीचा किंबहुना यापेक्षा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्राला, युवा पिढीला देऊ..जो रोजगार अपेक्षित आहे, तो आम्ही उपलब्ध करून देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेना दिलं असल्याचं सामंत म्हणाले.
Read also
- “देवाचा कौल घेऊन भाजपात प्रवेश केला”; गोव्यातील काॅंग्रेस आमदाराचं वक्तव्य
- “मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या पत्राचा विचार करावा”; सुप्रिया सुळे
- “ही वेळ ‘एकदम ओक्के’ म्हणण्याची नसून कृती करण्याची आहे”; राष्ट्रवादीने शिंदेंना फटकारलं
- “काँग्रेसने भारत जोडो यात्रा सुरू केली, मात्र गोव्यात काँग्रेस छाडो यात्रा सुरू झाली आहे”; प्रमोद सावंत
- “लक्षात ठेवा…! राज्यात अस्सल हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे”; तुषार भोसले