मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या दसरा मेळावा यंदा चांगलाचं चर्चेत राहिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर आता या दोन्ही गटांने दसरा मेळावा होण्यासाठी शिवाजी पार्क येथील मैदान मिळण्यासाठी महापालिकेला अर्ज केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात एक आपलं मत नोंदवलं आहे.
“लक्षात ठेवा…! राज्यात अस्सल हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे”; तुषार भोसले
दादर येथील शिवाजी पार्क मैदान मिळण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून अनिल परब यांनी महापालिकेत अर्ज सादर केला आहे. त्याचवेळी शिंद गटातील नेते सदा सरवणकर यांनी देखील मैदान मिळण्यासाठी अर्ज सादर केला आहे. त्यावर आता महापालिका कुणाला परवानगी देणार त्याकडे लक्ष्य लागून राहिलं आहे. त्यावर शिवसेनेचा दसरा होणार असून तो आम्हीच घेणार असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.
“माझी अक्कल काढली, तरी मला फारसं वाईट वाटत नाही”; पेडणेकरांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर
शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार असून तो 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दसरा मेळाव्यासाठीचं ठिकाण अद्याप ठरलेलं नाही. आम्ही शिवाजी पार्क मैदानासाठी परवानगी मागितली आहे. जर परवानगी मिळाली तर तिथचं होईल, नाही मिळाली तर दुसरीकडे होईल. पण मेळावा होणार हे नक्की असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.
सेनेची जागा आता भाजप घेणार..! रिक्त झालेल्या जागेवर भाजपचा दावा, सेना-भाजपमध्ये रस्सीखेस
दरम्यान, दसरा मेळावा बीकेसी येथे आयोजित करण्यात यावा यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडून एमएमआरडीए ला पत्र लिहिण्यात आलं आहे. एमएमआरडीए ही सरकारी यंत्रणा नगर विकास खात्याच्या अंतर्गत येते. याआधी शिवाजी पार्क मैदानासाठी देखील शिवसेनेकडून पत्र लिहिण्यात आलं होतं. आता बीकेसी मैदानासाठी देखील शिवसेना खासदार अरविंद सांवत यांनी पत्र लिहिलं आहे. शिवसेनेच्या विचारांचं सोनं कुठे लुटलं जाणार? हे लवकरच कळेल असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
Read also
- “रशियावरून फडणवींसांचा फोन आला अन्…मला सांगितलं की..”; सांमंताचं वेदांत प्रकल्पावर मोठं वक्तव्य
- “देवाचा कौल घेऊन भाजपात प्रवेश केला”; गोव्यातील काॅंग्रेस आमदाराचं वक्तव्य
- “मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या पत्राचा विचार करावा”; सुप्रिया सुळे
- “ही वेळ ‘एकदम ओक्के’ म्हणण्याची नसून कृती करण्याची आहे”; राष्ट्रवादीने शिंदेंना फटकारलं
- “काँग्रेसने भारत जोडो यात्रा सुरू केली, मात्र गोव्यात काँग्रेस छाडो यात्रा सुरू झाली आहे”; प्रमोद सावंत