मुंबई : वेदांता प्रकरणावरून राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. विरोधी पक्ष वारंवार शिंदे-फडणवीस सरकारवर टिका करताना दिसत आहे. हे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच शिवसेनेचं मुखपत्र असलेला सामनामधून आज वेदांत प्रकल्प गुजरातला नेल्याची टिका केली आहे. याला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“उद्योगमंत्र्यांचा तरूणांनी राजीनामा मागितला पाहिजे”; वरूण देसाई
वेदांत प्रकल्प गुजरातला नेल्याची टिका केली जात आहे. मात्र हा प्रकल्प महाराष्ट्रात होताच कधी? असा सवाल करत महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पाला परवानगी दिलीच कधी? याचं पेग्विन सेना प्रमुखांनी उत्तर द्यावं, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
महाराष्ट्रातील मराठी माणसामध्ये भ्रम पसरवण्याचं काम पेग्विन सेनेच्या मार्फत होत आहे. सरकार याबाबत स्पष्टता देत आहे. वेदांत प्रकल्प महाराष्ट्रात होता म्हणताय तर तो सुरू कधी झाला? माविआने सर्व परवानग्या दिल्या होत्या का? जिथे तो प्रकल्प प्रस्तावित होता, तिथे जागेचं अॅक्विझिशन तरी झालं होतं का?, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
“वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यामागे मोदी नाहीत”; वेदांतच्या अध्यक्षांचे स्पष्टिकरण
वेदांत प्रकल्प राज्याबाहेर गेला म्हणताय तर याची चौकशी करा. आता खोटं सहन केलं जाणर नाही. केवळ त्यांच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही, म्हणुन हिणवलं जात आहे, यासाठी रान उठवणार असाल तर उच्च न्यायालयाच्या निवृत्ती न्यायाधीशांमार्फत या संपुर्ण प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, महाराष्ट्राला सत्य कळलंच पाहिजे . बोलायचे दात वेगळे आणि करायचे दात वेगळे हे चालणार नाही, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.
Read also
- “महाराष्ट्रातील वारकरी संप्रादयात घुसखोरी; काळजी नको मी प्रयत्न करेन”; शरद पवार
- “मुख्यमंत्री असताना मोदींनी अनेक प्रकल्प घोषीत करून हजारो करोड रूपये पाण्यात घातले”
- दिपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर?; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधान
- “त्या वेळी बहुदा जंयत पाटील अंतराळात फिरायला गेले होते” ; भाजप आमदाराचा टोला
- “तेव्हा राजसाहेबांनी मित्रांनाच काय पण भावाला पण सोडलं नाही”; मनसे नेते संदीप देशपांडे