मुंबई : महाराष्ट्रातील वारकरी संप्रादयात आणि भक्ती मार्गात वेगवेगळ्या शक्ती घुसखोरी करत आहेत. वारकऱ्यांचा वेध धारण करून समाजासमाजात तेढ निर्माण केली जात आहे, अशी खंत वारकरी शिष्टमडळाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडली आहे. त्यावर वारकऱ्यांची परंपरा महाराष्ट्रात टिकली पाहिजे. वारकरी परंपरा जोपासण्यासाठी माझ्याकडून जे सहकार्य करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करेन, असं शरद पवार म्हणाले आहेत.
संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांपासून सुरू झालेली वारकरी परंपरा आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू झालेली धारकऱ्यांची परंपरा. या दोन्ही परंपरा टिकवण्याची जबाबदारी संत परंपरेत काम करणाऱ्या या कीर्तनकारांकडे येऊन ठेपली आहे. मात्र सध्या महाराष्ट्राच्या या वारकरी संप्रदायात आणि भक्ती मार्गात वेगवेगळ्या शक्ती घुसखोरी करत आहेत. वारकऱ्यांचा वेष धारण करून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची खंत वारकरी शिष्टमंडळाने माझ्यासमोर मांडली आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
“वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यामागे मोदी नाहीत”; वेदांतच्या अध्यक्षांचे स्पष्टिकरण
वारकऱ्यांची परंपरा महाराष्ट्रात टिकली पाहिजे, या मताचा मी देखील आहे. वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांना ज्या समस्या भेडसावत आहेत किंवा त्यांच्या प्रश्नांसाठी समाजातील सर्व घटकांना एकत्र येऊन काम करावे लागेल. एक चळवळ म्हणून याकडे पाहावे लागेल. वारकरी परंपरा जोपासण्यासाठी माझ्याकडून जे सहकार्य करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करेन, असंही शरद पवार म्हणाले.
Read also
- “मुख्यमंत्री असताना मोदींनी अनेक प्रकल्प घोषीत करून हजारो करोड रूपये पाण्यात घातले”
- दिपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर?; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधान
- “त्या वेळी बहुदा जंयत पाटील अंतराळात फिरायला गेले होते” ; भाजप आमदाराचा टोला
- “तेव्हा राजसाहेबांनी मित्रांनाच काय पण भावाला पण सोडलं नाही”; मनसे नेते संदीप देशपांडे
- “उद्योगमंत्र्यांचा तरूणांनी राजीनामा मागितला पाहिजे”; वरूण देसाई