मुंबई : पेंग्विनसेना जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम करत आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात होता तर, या प्रकल्पाची पायाभरणी, भूमिपुजन झालं होतं का? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. तसेच त्यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. राज्यात सध्या वेदांत प्रकल्पावरून राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.
“पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?”खडसेंचा शिंदेंना खोचक टोला
फॉक्सकॉन आणि वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात होता तर तो गुजरातला नेला गेला तर राज्यात तो होता कधी? त्याच्या जागेचा प्रश्न सोडवला कधी? करारनामा झाला कधी? या प्रश्नांची उत्तर आम्हाला पेंग्विन सेनेकडून हवी आहेत. केवळ तुमच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला म्हणून त्यांना हिणवणार असाल तर घालून पाडून बोलणार असाल तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर पेंग्विन सेना देत नसेल तर निवृत्त न्यायधिशांमार्फत चौकशी करा. असं देखील त्यांनी मागणी केली आहे.
“सुप्रिया सुळेंना सत्ता गेल्याचं दु:ख झालं आहे”; सुधिर मुनगंटीवारांचं सुळेंना प्रत्युत्तर
वेदांत प्रकल्पावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केला जात आहे. 40 गद्दारांनी आघाडी सरकार पाडलं म्हणुन वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प रखडला आहे, असा आरोप युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरेंनी केला आहे. यावरुन भाजप नेते अतुल भतखळ यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का..; देशातील 12 सेनेच्या राज्यप्रमुखांचा शिंदेंना पाठिंबा
40 गद्दारांनी आघाडी सरकार पाडलं म्हणुन वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प रखडला आहे, असा आरोप युवासेना प्रुमुख व आमदार आदित्य ठाकरेंनी केला आहे. तर नाणार, जैतापूर, बुलेट ट्रेन, मेट्रो कारशेड रखडवणारा गद्दार कोण?, असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
Read also
- “नाणार, जैतापूर, बुलेट ट्रेन, मेट्रो कारशेड रखडवणारा गद्दार कोण?”; भाजपचा शिवसेनेला सवाल
- “भविष्यातील मोठ्या प्रकल्पाचं निव्वळ चॉकलेट देऊ नका”; अशोक चव्हाण भाजपवर संतापले
- “भगवान गडावर दसरा मेळावा घेणारच, करूणा मुंडे ठाम”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा
- “अटक करावी, नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी माफी मागावी”
- “याचं डोकं फक्त साखरेच्या खोक्यामध्ये अडकलं”; प्रकाश आंबेडकरांचा राष्ट्रवादीवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल