मुंबई : वेदांत प्रकल्पावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केला जात आहे. 40 गद्दारांनी आघाडी सरकार पाडलं म्हणुन वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प रखडला आहे, असा आरोप युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरेंनी केला आहे. यावरुन भाजप नेते अतुल भतखळ यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
“सुप्रिया सुळेंना सत्ता गेल्याचं दु:ख झालं आहे”; सुधिर मुनगंटीवारांचं सुळेंना प्रत्युत्तर
40 गद्दारांनी आघाडी सरकार पाडलं म्हणुन वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प रखडला आहे, असा आरोप युवासेना प्रुमुख व आमदार आदित्य ठाकरेंनी केला आहे. तर नाणार, जैतापूर, बुलेट ट्रेन, मेट्रो कारशेड रखडवणारा गद्दार कोण?, असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का..; देशातील 12 सेनेच्या राज्यप्रमुखांचा शिंदेंना पाठिंबा
सध्या महाराष्ट्राच्या या वारकरी संप्रदायात आणि भक्ती मार्गात वेगवेगळ्या शक्ती घुसखोरी करत आहेत. वारकऱ्यांची परंपरा महाराष्ट्रात टिकली पाहिजे, या मताचा मी देखील आहे. वारकरी परंपरा जोपासण्यासाठी माझ्याकडून जे सहकार्य करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करेन, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. यावरून तुम्ही आहात हीच तर भीती आहे, तिथेही जातीपातीचे राजकारण सुरू कराल, असा आरोप अतुल भतखळ यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.
“केवळ त्यांच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही, म्हणुन हिणवलं जातंय”; आशिष शेलार
सोबतच, हिंदूत्वासाठी सरकार सोडले, पण राज्यात साधू सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, अशी टिका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली होती. यावरून हिंदुत्ववादी म्हणून सत्तेत आलेल्या शिंदे आणि भाजपाच्या राज्य सरकारच्या काळात साधू सुरक्षित नाहीत. साधूंना मारहाण करणे अयोग्य असून मारहाण करणे चुकीचे आहे इति जयंत पाटील. पालघर साधू हत्याकांडाच्या वेळी बहुदा जयंत पाटील अंतराळात फिरायला गेले होते. त्यांना ती घटना माहितीच नसावी, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
Read also
- “भविष्यातील मोठ्या प्रकल्पाचं निव्वळ चॉकलेट देऊ नका”; अशोक चव्हाण भाजपवर संतापले
- “भगवान गडावर दसरा मेळावा घेणारच, करूणा मुंडे ठाम”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा
- “अटक करावी, नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी माफी मागावी”
- “याचं डोकं फक्त साखरेच्या खोक्यामध्ये अडकलं”; प्रकाश आंबेडकरांचा राष्ट्रवादीवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल
- “पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?”खडसेंचा शिंदेंना खोचक टोला