मुंबई : राज्यात महाविकास आघाडीच सरकार असताना भाजप नेते किरीट सोमय्या आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सातत्याने करीत होते. मात्र राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर आता भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर किरीट सोमय्या शांत झाल्याची टिका विरोधक करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते क्लाईट क्रास्टो यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.
“आधी ‘ईडी-पीडा’ टळावी, यासाठी अग्नी पेटवा, खिचडी आपोआप शिजत जाईल”
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सेनेचे अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजप-शिंदे युतीमध्ये सहभागी झाले. यामध्ये खासदार भावना गवळी, प्रताप सरदेसाई, यशवंत जाधव, यामिनी जाधव यांच्यावर या अगोदर किरीट सोमय्या हल्ल्यावर हल्ला करीत तुरूंगात डांबण्याची भाषा करीत होते. पंरतु ज्यावेळी राज्यात युतीचं सरकार आलं. तेव्हापासून किरीट सोमय्या शांत बसल्याची टिका आता विरोधक करीत आहे.
” याद राखा…! अगोदर चाबकाचे फटके मग कायद्याचे फटके मिळतील”; रूपाली पाटलांचा सज्जड दम
प्रतापसरनाईक प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट किरीट सोमय्यांनी स्वीकारला आहे. तुम्ही यांची घाण उघड केली पण इडी सरकारच्या वॉशिंग मशीनने साफ केली. तुमची सगळी मेहनत वाया गेली. तुम्हाला वाईट वाटतंय का ? असा खोचक सवाल देखील क्रास्टो यांनी सोमय्यांना केला आहे. त्याचबरोबर किरीट भाई आत्ता गप्प का ? तुमचा आवाज बसला आहे की बसवला गेला आहे ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
“केंद्र आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावत आहेत का?”; नाना पटोले
दरम्यान, आघाडीचं सरकार सत्तेत असताना सोमय्यांसोबत चित्रा वाघ, गोपीचंद पडळकर असे अनेक नेते महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर टिका आणि भ्रष्टाचाराचे आरोप करीत होते. या अगोदर त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या विरोधात रान पेटवलं होतं. परंतु शिंदेंनी फडणवीसांची साथ घेतली आणि भाजप नेते शांत झाले. यावरून विरोधक त्यांना आता टोमणे हाणत आहेत.
Read also
- “फडणवीसांना न विचारता निर्णय जाहीर केला, म्हणून कृषीमंत्र्यांना पुन्हा झापणार”
- “शेतकऱ्यांची मुलं शेती करणार, आता पाचवीपासून शेतीचे धडे”?; कृषी मंत्र्यांची घोषणा
- “आढळरावांचे आरोप म्हणजे राजकीय वैचारिक दारिद्याचं लक्षण”; अमोल कोल्हे
- “महाराष्ट्रात साधू सुरक्षित नसतील तर हिंदुत्वाचे सरकार कसे”? जयंत पाटलांचा सवाल
- “शिवसैनिकांचा हात काॅंग्रेसकडे जाणार नाही, ज्यांचा गेला तो बाळासाहेबांचा औलादच नाही”; संजय गायकवाड