औरंगाबाद : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अलिकडेच महत्वाची घोषणा केली आहे. आतापासून राज्यात पाचवीपासून कृषीचे धडे विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार असल्याचं अब्दूल सत्तार यांनी म्हटलं आहे. अब्दूल सत्तार यांच्या या निर्णयानंतर राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी त्यांना खोचक टोला देखील लगावले आहेत.
” याद राखा…! अगोदर चाबकाचे फटके मग कायद्याचे फटके मिळतील”; रूपाली पाटलांचा सज्जड दम
राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांची मुलं नोकऱ्यांसाठी शिक्षण घेत असतात. परंतु सगळ्यांनाच नोकऱ्या काही मिळत नाहीत. त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण झाल्यानंतर त्याला शेती तरी चांगली करता आली पाहिजे. त्यामुळे पाचवीपासून आता विद्यार्थ्यांना कृषी हा विषय शिकवला जावा. यासाठी शिक्षणमंत्र्यांकडे याचा प्रस्ताव मांडणार आहे. असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
“केंद्र आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावत आहेत का?”; नाना पटोले
तसेच याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा करणार आहे. एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर त्याला किमान चांगली शेती तरी करता आली पाहिजे. या शिक्षणामध्ये शेतीविषयी अवजारे, तंत्र अवगत केली जातील. त्याचा फायदा त्याला होणार आहे. यासाठी लवकरात लवकर एक समिती देखील गठीत केली जाणार आहे. असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
“..तर निवृत्त न्यायधिशांमार्फत चौकशी करा”; आशिष शेलारांचा मागणी
दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी खोचक टोला हाणला आहे. त्या म्हणाल्या की, इयत्ता पाचवीपासून विद्यार्थ्यांना शेतीचे धडे, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा निर्णय आहे. निर्णयाचे स्वागत पण फडणवीसांना न विचारता जाहीर केला म्हणून पुन्हा झापणार वाटतं असं रूपाली पाटलांनी म्हटलं आहे.
Read also
- “शेतकऱ्यांची मुलं शेती करणार, आता पाचवीपासून शेतीचे धडे”?; कृषी मंत्र्यांची घोषणा
- “आढळरावांचे आरोप म्हणजे राजकीय वैचारिक दारिद्याचं लक्षण”; अमोल कोल्हे
- “महाराष्ट्रात साधू सुरक्षित नसतील तर हिंदुत्वाचे सरकार कसे”? जयंत पाटलांचा सवाल
- “शिवसैनिकांचा हात काॅंग्रेसकडे जाणार नाही, ज्यांचा गेला तो बाळासाहेबांचा औलादच नाही”; संजय गायकवाड
- “आधी ‘ईडी-पीडा’ टळावी, यासाठी अग्नी पेटवा, खिचडी आपोआप शिजत जाईल”