मुंबई : वेदांता कंपनी महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी राज्यात रान पेटवलं आहे. याप्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका देखील घेतली असून एकमेकांवर जोरदार चिखलफेक केली आहे. यामध्ये शिवसेनेने देखील वेदांता प्रकरणावरून भाजपला निशाण्यावर धरलं आहे. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर खोचक टोला हाणला आहे.
“महाराष्ट्रात साधू सुरक्षित नसतील तर हिंदुत्वाचे सरकार कसे”? जयंत पाटलांचा सवाल
उद्धव ठाकरे यांना आता काही काम राहिलं नाही. अडीच वर्ष मातोश्रीवर बसून राहिले होते. आताही त्यांना आपलं घरं सोडत नाही. फक्त बोलायचं म्हणून ते बोलत आहेत. स्वत: काही करू शकले नाहीत आणि त्यांनी केलेल्या पापामुळेच वेदांता कंपनी दुसरीकडे गेली आहे. अशी खोचक टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
“शिवसैनिकांचा हात काॅंग्रेसकडे जाणार नाही, ज्यांचा गेला तो बाळासाहेबांचा औलादच नाही”; संजय गायकवाड
राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला स्थलांतरित करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. या निर्णयामुळे राज्यातील लाखो तरूणांच्या रोजगारावर गदा आली आहे. याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने येत्या २० सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाची सुरुवात आज मुंबई येथून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या पुढाकाराने करण्यात आली. यावेळी पन्नास खोके-माजलेत बोके, ढोकळा ना फापडो- वेदांता प्रोजेक्ट आपलो, महाराष्ट्राला धोके – सीएमला खोके, ईडी सरकारचा धिक्कार असो अशा राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
Read also
- “गद्दार संजय गायकवाडांनी कुणावर काही बोलणं म्हणजे एक प्रकारे विनोदच”; शिवसैनिकांचा हल्लाबोल
- “किरीट भाई आत्ता गप्प का ? तुमचा आवाज बसला आहे की बसवला गेला ?” राष्ट्रवादीचा सवाल
- “फडणवीसांना न विचारता निर्णय जाहीर केला, म्हणून कृषीमंत्र्यांना पुन्हा झापणार”
- “शेतकऱ्यांची मुलं शेती करणार, आता पाचवीपासून शेतीचे धडे”?; कृषी मंत्र्यांची घोषणा
- “आढळरावांचे आरोप म्हणजे राजकीय वैचारिक दारिद्याचं लक्षण”; अमोल कोल्हे