पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केल्यामुळे उद्धव ठाकरेंचा याचा मोठा फटका बसला आहे. आता सध्या शिवसेना नेमकी कुणाची? आणि त्यानंतर शिवाजी पार्क येथे होणारा दसरा मेळावा नेमका कोण घेणार ? यासाठी आता शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मोठी चढाओढ सुरू आहे. या वादात आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उडी घेतली आहे.
“शेतकऱ्यांची मुलं शेती करणार, आता पाचवीपासून शेतीचे धडे”?; कृषी मंत्र्यांची घोषणा
शिवाजी पार्क येथे होणारा दसरा मेळावा आम्हीच घेणार असा दावा दोन्ही बांजूनी केला जात आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने अनिल परब यांनी तर शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांनी महापालिकेला मैदान मिळण्यासाठी अर्ज सादर केला आहे. त्यातच आता मैदान कुणाला द्यावा असा प्रश्न महापालिकेला पडला आहे. यामध्ये महापालिकेने देखील मोठी खेळी करत हा निर्णय आता पुढे पाठविला आहे.
“आढळरावांचे आरोप म्हणजे राजकीय वैचारिक दारिद्याचं लक्षण”; अमोल कोल्हे
शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या या वादात अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना खोचक टोमणा हाणला आहे. ते म्हणाले की, शिवाजी पार्कच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं की माझे आता वय झाले आहे. शिवसेनेचे या पुढील नेतृत्व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहा. बाळासाहेबांनी याबाबत त्यांच्या पुतण्याला ही बाजूला केलं होतं. हे आमदार मात्र तिकडे पळाले. आता बाळासाहेब हयात असते तर एकनाथ शिंदे यांची बिन पाण्याने केली असती, असा खोचक टोमणा अजित पवारांनी हाणला.
“महाराष्ट्रात साधू सुरक्षित नसतील तर हिंदुत्वाचे सरकार कसे”? जयंत पाटलांचा सवाल
दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात दसरा मेळाव्यावरून वाद सुरू आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे सातत्याने दसरा मेळावा आम्हीच घेणार असल्याचं सांगत आहेत. तर शिंदे गटातील आमदार देखील आम्हीच दसरा मेळावा घेणार असल्याचा दावा करीत आहे. आता दसरा मेळाव्यासाठी महापालिका कुणाला मैदानाची परवानगी देणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
Read also
- “आता मुख्यमंत्र्यांचा आवाज BJP अन् ED ने म्युट केलाय”; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
- “उद्धव ठाकरेंच्या पापामुळे वेदांत कंपनी गुजरातला गेली”; नारायण राणेंची टिका
- “गद्दार संजय गायकवाडांनी कुणावर काही बोलणं म्हणजे एक प्रकारे विनोदच”; शिवसैनिकांचा हल्लाबोल
- “किरीट भाई आत्ता गप्प का ? तुमचा आवाज बसला आहे की बसवला गेला ?” राष्ट्रवादीचा सवाल
- “फडणवीसांना न विचारता निर्णय जाहीर केला, म्हणून कृषीमंत्र्यांना पुन्हा झापणार”