मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे-फडणवीस एकत्रितपणे लढणार असल्याचा दावा दोन्ही बाजूंनी केला आहे. यातच भाजपचे नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. त्यावरून भाजप मनसेसोबत युती करणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.
“गद्दार संजय गायकवाडांनी कुणावर काही बोलणं म्हणजे एक प्रकारे विनोदच”; शिवसैनिकांचा हल्लाबोल
राज ठाकरे यांनी निळा व हिरवा आणि भगवा रंग वगळून एकच रंग हाती घेतल्याने त्यांचा युतीला काहीच फायदा होणार नाही. असं राज आठवले यांनी म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिकेत आठवले गटाला 15 जागा मिळाल्या आणि उपमहापौर पद द्यावे, असं देखील रामदास आठवले. तसेच शिंदे गट हीच शिवसेना असल्याचं म्हणत धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देऊन, उद्धव ठाकरे यांच्या गटाला वेगळं चिन्ह द्याव. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत निश्चितपणे शिवसेनेला मुंबईतून हद्द पार करणार असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
“किरीट भाई आत्ता गप्प का ? तुमचा आवाज बसला आहे की बसवला गेला ?” राष्ट्रवादीचा सवाल
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अलिकडेच राज्यातील भाजपच्या नेत्यांची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये 150 नगरसेवक निवडणुन आणण्याचं लक्ष्य दिलं आहे. यातच आता शिंदे गट आणि भाजप एकत्रित लढणार असल्याचं अमित शहा यांनी देखील जाहीर केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
Read also
- “मंत्र्यांनी बंगले घेतले, पद घेतली, पण महाराष्ट्रात पालकमंत्री कुठं आहेत”? आदित्य ठाकरेंचा सवाल
- पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचं चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्घाटन…! स्थानिक नेत्यांचं मोलाचं योगदान
- “आता बाळासाहेब हयात असते तर शिंदेंची बिन पाण्याने केली असती”; अजित पवारांची टोलेबाजी
- “आता मुख्यमंत्र्यांचा आवाज BJP अन् ED ने म्युट केलाय”; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
- “उद्धव ठाकरेंच्या पापामुळे वेदांत कंपनी गुजरातला गेली”; नारायण राणेंची टिका