पुणे : गेल्या अनेक दिवसापासून रखडलेला पाषाण-सूसला जोडणारा उड्डाणपूलाचं उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. हा उड्डाणपूलामुळे हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्कच्या बाजूला होणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच याठिकाणीतील वाहतुक कोंडीचा प्रश्न देखील सुटणार आहे. हा उड्डाणपुल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर पुणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणार आहे. यासाठी भाजपचे कार्यकर्ते लहू बालवडकर यांनी वेळोवेळी याचा पाठपुरावा केला होता.
“फडणवीसांना न विचारता निर्णय जाहीर केला, म्हणून कृषीमंत्र्यांना पुन्हा झापणार”
चांदणी चौकातील सहापदरी पूलामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि त्यासाठी वाहतूक वळवण्यासाठी काही बाबतीत हा पूल उपयुक्त होईल. पुणे शहराची गतीने वाढ होत आहे. उद्योग, व्यापार, शैक्षणिक क्षेत्र आदींमध्ये शहर पुढे राहण्यासाठी रस्ते, उडाणपूल, मेट्रो, पूल आदी पायाभूत सुविधांची निर्मिती गरजेची आहे. चांगल्या प्रकारचे घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाण्याची व्यवस्था, शांतता आदीमुळे सर्वांनाच हे शहर राहण्यासाठी सुरक्षित वाटते. असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं आहे.
“शेतकऱ्यांची मुलं शेती करणार, आता पाचवीपासून शेतीचे धडे”?; कृषी मंत्र्यांची घोषणा
तर गेल्या अनेक दिवसापासून या भागात वाहतुक कोंडीचा प्रश्न नागरिकांना सातवत होता. वाहतुक कोंडींची समस्या बघता तसेच इतर पायाभुत सुविधांची निर्मिती होत असल्याचंं लक्षात घेऊन या प्रकल्पाला राज्यातील भाजप सरकारने पाठपुरावा करून निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यसरकारचं मनापासून आभार व्यक्त करायला हवं. अस मत माजी नगरसेवक आणि भाजपचे कार्यकर्ते लहु बालवडकर यांनी व्यक्त केले.
“आढळरावांचे आरोप म्हणजे राजकीय वैचारिक दारिद्याचं लक्षण”; अमोल कोल्हे
दरम्यान, हा प्रकल्प 41 कोटी रूपये खर्चातून उभारलेला 740 मीटर लांबीचा हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वर पाषाण-सूसला जोडणारा आहे. पाषाण-कात्रज, हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क, मुळशीला जोडणारा हा पुल वाहतुकीसाठी मोठा उपयुक्त ठरणार आहे. हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारी आणि मुळशीकडून येणारी वाहतुक सुकर होणार आहे.
Read also
- “आता बाळासाहेब हयात असते तर शिंदेंची बिन पाण्याने केली असती”; अजित पवारांची टोलेबाजी
- “आता मुख्यमंत्र्यांचा आवाज BJP अन् ED ने म्युट केलाय”; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
- “उद्धव ठाकरेंच्या पापामुळे वेदांत कंपनी गुजरातला गेली”; नारायण राणेंची टिका
- “गद्दार संजय गायकवाडांनी कुणावर काही बोलणं म्हणजे एक प्रकारे विनोदच”; शिवसैनिकांचा हल्लाबोल
- “किरीट भाई आत्ता गप्प का ? तुमचा आवाज बसला आहे की बसवला गेला ?” राष्ट्रवादीचा सवाल