रायगड : उद्योगमंत्र्यांना माहिती नाहीये महाराष्ट्रात उद्योग किती आहेत. दुसरे एक मंत्री संजय राठो़ड आहेत. त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप झाले. पण शपथविधी झाल्यानंतर आजही त्यांनी मंत्रीपदाचा पदभार घेतलेला नाही. काम सुरू केलेलं नाही. असे मंत्री मंत्रिमंडळात का आहेत ? अनेक मंत्र्यांनी बंगले घेतले, पद घेतली आहेत. पण महाराष्ट्रात अजून पालकमंत्री जाहीर झाले नाहीत असा घणाघात शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केला.
“किरीट भाई आत्ता गप्प का ? तुमचा आवाज बसला आहे की बसवला गेला ?” राष्ट्रवादीचा सवाल
एअरबस आणि टाटा हा एक मोठा प्रस्ताव आहे. याचा पाठपुरावा आपण करत आहोत. आम्हाला नागपुरमध्ये एअरबसची कंपनी आणायची होती. अगदी तीन दिवसांपुर्वी मी बोलेपर्यंत या सरकारला, मुख्यमंत्र्यांना, उद्योगमंत्र्यांना एअरबस नावाच प्रकल्प आहे हे माहितीही नव्हतं. आज म्हणतायत आम्ही एअरबस प्रकल्पाचा पाठपुरावा करत आहोत. असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“फडणवीसांना न विचारता निर्णय जाहीर केला, म्हणून कृषीमंत्र्यांना पुन्हा झापणार”
वेदांतामधून एक लाख 50 हजार कोटींची गुंतवणुक येणार होती. त्यातून 1 लाख रोजगार महाराष्ट्रात येणार होते. जूनमध्ये सुभाष देसाई दिल्लीला गेले. फॉक्सकॉन कंपनीच्या प्रतिनिधींना भेटले. तेव्हा तळेगावमध्येच कंपनी येणार हे निश्चित करण्यात आलं. त्यानंतर सरकार पडलं. 15 जुलैला उच्चस्तरीय समितीची बैठक होऊन सगळं ठरलं. त्यानंतरही हा प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर ही प्रकल्प गुजरातला गेला. असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
“शेतकऱ्यांची मुलं शेती करणार, आता पाचवीपासून शेतीचे धडे”?; कृषी मंत्र्यांची घोषणा
दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून राज्यात वेदांत प्रकल्पावरून टिका टिप्पणी होताना दिसत आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालं आहे.
Read also
- पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचं चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्घाटन…! स्थानिक नेत्यांचं मोलाचं योगदान
- “आता बाळासाहेब हयात असते तर शिंदेंची बिन पाण्याने केली असती”; अजित पवारांची टोलेबाजी
- “आता मुख्यमंत्र्यांचा आवाज BJP अन् ED ने म्युट केलाय”; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
- “उद्धव ठाकरेंच्या पापामुळे वेदांत कंपनी गुजरातला गेली”; नारायण राणेंची टिका
- “गद्दार संजय गायकवाडांनी कुणावर काही बोलणं म्हणजे एक प्रकारे विनोदच”; शिवसैनिकांचा हल्लाबोल