नांदेड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच पोलीस भरती आणि स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी दिली. तसेच राज्यात पोलीस भरती झालीच पाहिजे, रिक्त झालेली पद भरलीच पाहिजे अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांनी केली. यावेळी त्याठिकाणी मोठा गोंधळ बघायला मिळाला. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
“पांढऱ्या पावलांच सरकार आलं अन् प्रकल्प गुजरातला गेला”; मनिषा कांयदे
देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचा विश्वास गमवल्यानेच त्यांच्याविरोधात तरूणांची घोषणाबाजी सुरू आहे. मराठवाड्यातील तरूणांनी बेरोजगारी व पोलीस भरती विषयी सरकारला जाब विचारत फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या वडील व मंत्री राहिलेल्या चुलतीच्या आशीर्वादाने घराणेशाहीतून राजकाऱणात स्थिरावलेल्या देवेंद्र फडणवीसांना बेरोजगारांच्या वेदना माहिती नाही म्हणून त्यांनी तरूणांना प्रतिसाद देण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज केला असा हल्लाबोल रूपाली पाटलांनी केला.
“वेदांता प्रकल्पासाठी BMC ने किती रेटने मागणी केली होती”; शेलारांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद हिसकावून घेतल्याने मुख्य उपमुख्यमंत्रीपदी पद रूचत नसल्याने देवेंद्रजी त्याचा राग महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरूणावर काढणार आहेत काय? असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. रूपाली पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख गाजरसम्राट केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, गाजरसम्राट देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासहर्ता गमावली. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही. सत्ता आल्यावर धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये एसटीचे आरक्षण देणार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला 6 हजार कोटींचे पॅकेज देणार. नाशिक विकासासाठी दत्तक घेणार. गुंतवणुकीत महाराष्ट्र एक नंबरवर घेऊन जाणार. देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात. असं रूपाली पाटलांनी म्हटलं आहे.
“बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यास धाडस लागतं”; उदय सामंतांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं
देवेंद्र फडणवीस खोटं आज बोलत आहेत. ते आज म्हणाले की दोन वर्षात गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला. वरील आकडेवारी ही केंद्र शासनाची आहे. त्यानुसार महाराष्ट्रात 2021 मध्ये आलेल्या गुंतवणुकीच्या मानाने गुजरात मधील गुंतवणुक 5 पट कमी आहे. असं रूपाली पाटलांनी म्हटलं आहे. त्याचसोबत रूपाली पाटलांनी देशातील विविध राज्यांतील गुंतवणुकीची आकडेवारी देखील दाखविली आहे.
Read also
- उत्तराखंडमधील अजस्त्र काला नाग पर्वतावर चढाई ; ‘लेक वाचवा’चा दिला संदेश
- “मराठवाडा मुक्तिसंग्रामचा कार्यक्रम शिंदेंनी 15 मिनिटांत उरकला, अन् शिंदे-सेनेत वाद पेटला”
- “रझाकार अन् सजाकारांचा बंदोबस्त मनसे करणार”; राज ठाकरेंचं औरंगाबादच्या ‘मुक्ति’संग्रामाचं पत्र
- “गाजरसम्राट देवेंद्र फडणवीसांनी विश्वासहर्ता गमावली”; रूपाली पाटलांचा हल्लाबोल
- “मग यंदाच्या भाऊबीजेला भावाला ओवाळून या, बघा वेदांत परत मिळतोय का? राष्ट्रवादीचा फडणवीसांना सवाल