पुणे : वेदांता प्रकल्पावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात आणि महराष्ट्राची आकडेवारी स्पष्ट करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. गेल्या दोन वर्षात राज्याने पहिला क्रमांक गमवला असून गुजरात पहिल्या क्रमांकावर गेला आहे. तेथील तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणुक या काळात 23 अब्ज डॉलर्सवर गेली आणि आपण 18 अब्ज डॉलर्सवर घसरलो. केवळ गुजरातविरोधात भाषणे देऊन चालणार नाही तर चांगल्या योजना आखाव्या लागतात. असं देवेंद्र फडणवीसांनी सुनावलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी फडणवीसांच्या मागील सगळ्या गोष्टी बाहेर काढून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“मंत्र्यांनी बंगले घेतले, पद घेतली, पण महाराष्ट्रात पालकमंत्री कुठं आहेत”? आदित्य ठाकरेंचा सवाल
रूपाली पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख गाजरसम्राट केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, गाजरसम्राट देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासहर्ता गमावली. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही. सत्ता आल्यावर धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये एसटीचे आरक्षण देणार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला 6 हजार कोटींचे पॅकेज देणार. नाशिक विकासासाठी दत्तक घेणार. गुंतवणुकीत महाराष्ट्र एक नंबरवर घेऊन जाणार. देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात. असं रूपाली पाटलांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस खोटं आज बोलत आहेत. ते आज म्हणाले की दोन वर्षात गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला. वरील आकडेवारी ही केंद्र शासनाची आहे. त्यानुसार महाराष्ट्रात 2021 मध्ये आलेल्या गुंतवणुकीच्या मानाने गुजरात मधील गुंतवणुक 5 पट कमी आहे. असं रूपाली पाटलांनी म्हटलं आहे. त्याचसोबत रूपाली पाटलांनी देशातील विविध राज्यांतील गुंतवणुकीची आकडेवारी देखील दाखविली आहे.
“आता बाळासाहेब हयात असते तर शिंदेंची बिन पाण्याने केली असती”; अजित पवारांची टोलेबाजी
दरम्यान, गेल्या दोन वर्षात राज्याने गुंतवणुकीमध्ये पहिला क्रमांक गमावला आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर गेले. तेथील तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणुक या काळात 23 अब्ज डॉलर्सवर गेली. महाराष्ट्र मात्र 18 अब्ज डॉलर्सवर घसरला. केवळ गुजरातविरोधात भाषणे देऊन चालत नाही. आपल्या राज्यासाठी चांगल्या योजना आखाव्या लागतात. गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही, तो आपला लहान भाऊच आहे. असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Read also
- “मग यंदाच्या भाऊबीजेला भावाला ओवाळून या, बघा वेदांत परत मिळतोय का? राष्ट्रवादीचा फडणवीसांना सवाल
- “पांढऱ्या पावलांच सरकार आलं अन् प्रकल्प गुजरातला गेला”; मनिषा कांयदे
- “वेदांता प्रकल्पासाठी BMC ने किती रेटने मागणी केली होती”; शेलारांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
- “बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यास धाडस लागतं”; उदय सामंतांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं
- “भाजपने मुंबई महापालिकेत उपमहापौर पद द्यावं”; रामदास आठवलेंची आता नवी मागणी