औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित आज औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित आज हैदराबाद येथे महाराष्ट्रा, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या मिळून मुक्तिसंग्रामचा एक संयुक्त कार्यक्रम आयोजिक करण्यात आल्याने शिंदे लगेच निघून गेले. त्यावर आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टिका केली आहे.
“बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यास धाडस लागतं”; उदय सामंतांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं
औरंगाबाद येथील कार्यक्रम सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला होता. परंतु एकनाथ शिंदेंनी सकाळी सात वाजताच औरंगाबादमधील ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेतला. केवळ 15 मिनिटांत सर्व कार्यक्रम आटोपून शिंदे हैदराबादला रवाना झाले. त्यानंतर आता शिंदे गट आणि शिवसेनेच्या वादाला सुरूवात झाली आहे. तसेच चंद्रकांत खैरे यांच्यासह सेनेच्या इतर नेत्यांनी परत सिद्धार्थ उद्यान येथे जाऊन मराठवाडा मुक्तीसंग्राम स्तंभास अभिवादन केलं.
“भाजपने मुंबई महापालिकेत उपमहापौर पद द्यावं”; रामदास आठवलेंची आता नवी मागणी
यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले की, निझामाच्या तावडीतून मराठी माणसाला सोडवण्यासाठी अनेकांनी प्राणाची बाजी लावली. त्यांच्यासाठी केवळ आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ अर्धा तास येऊन कार्यक्रमाला छोटे स्वरूप देऊन गेले. आतापर्यंत इतिहासात नेहमी 9 वाजेपर्यंतची पंरपरा कायम होती. यावेळी कुठल्याही ठोस घोषमा न करता कागदपत्री भाषण करत त्यांनी मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप खैरेंनी केला.
“मंत्र्यांनी बंगले घेतले, पद घेतली, पण महाराष्ट्रात पालकमंत्री कुठं आहेत”? आदित्य ठाकरेंचा सवाल
यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, आमदार उदयसिंग राजपूत, माजी महापौर नंदकुमार घोडेले, भाकासे सरचिटणीस प्रभाकर मते पाटील, महिला संपर्कसंघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनीता देव, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, बंडू ओक, आनंद तांदुळवाडीकर, गणू पांडे, विधानसभा संघटक राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, उपशहरप्रमुख मकरंद कुलकर्णी, माजी नगरसेवक किशोर नागरे, कमलाकर जगताप, हिरालाल सलामपुरे, अमित वाहुल, तुकाराम सराफ, सोपान बांगर, नारायण कानकाटे, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटक अंजली मांडवकर, जयश्री लुंगारे, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, शहर संघटक आशा दातार, विद्या अग्निहोत्री, सुचिता आंबेकर, कविता सुरळे, रेणुका जोशी, अलका कांदे, सीमा गवळी, शोभा साबळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
Read also
- “रझाकार अन् सजाकारांचा बंदोबस्त मनसे करणार”; राज ठाकरेंचं औरंगाबादच्या ‘मुक्ति’संग्रामाचं पत्र
- “गाजरसम्राट देवेंद्र फडणवीसांनी विश्वासहर्ता गमावली”; रूपाली पाटलांचा हल्लाबोल
- “मग यंदाच्या भाऊबीजेला भावाला ओवाळून या, बघा वेदांत परत मिळतोय का? राष्ट्रवादीचा फडणवीसांना सवाल
- “पांढऱ्या पावलांच सरकार आलं अन् प्रकल्प गुजरातला गेला”; मनिषा कांयदे
- “वेदांता प्रकल्पासाठी BMC ने किती रेटने मागणी केली होती”; शेलारांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप