पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसारख्या चळवळीत वाढलो. विधानपरिषद ते विधानसभा, भाजपामध्ये सरचिटणीस, उपाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष या पदांची जबाबदारी निभावली. कुठलीही राजकीय पार्श्वभूमीवर नसताना एक गिरणी कामगाराचा मुलगा इथपर्यंत पोहोचला ही आपल्या लोकशाहीची खासियत आहे. असं मत कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
“मराठवाडा मुक्तिसंग्रामचा कार्यक्रम शिंदेंनी 15 मिनिटांत उरकला, अन् शिंदे-सेनेत वाद पेटला”
एमआयटीच्या वतीने छात्र संसदेत त्यांनी उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक प्रा.डॉ. विश्वनाथ कराड व इतर जण उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सध्या चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी पाहत आहेत.
“रझाकार अन् सजाकारांचा बंदोबस्त मनसे करणार”; राज ठाकरेंचं औरंगाबादच्या ‘मुक्ति’संग्रामाचं पत्र
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महसुल मंत्रालयासारखी मोठी जबाबदारी सांभाळलेल्या चंद्रकांत पाटलांना शिंदे मंत्रिपद देण्यात आलं. परंतु त्याआधी त्यांच्याकडील भाजप प्रदेशाध्यक्ष पद काढून घेण्यात आलं. पाटलांना प्रदेशाध्यपदावरून पायउतार व्हावे लागले आणि कॅबिनेटमध्येही तुललेने कमी महत्वाचे मानले जाणारे खाते मिळाले त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
“गाजरसम्राट देवेंद्र फडणवीसांनी विश्वासहर्ता गमावली”; रूपाली पाटलांचा हल्लाबोल
दरम्यान, 2013 साली त्यांची पक्षाच्या प्रदेशाध्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत त्यांनी पु्न्हा विजय संपादन करत विधान परिषेदमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर दमदार विजय मिळवला. तसेच देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे सहकार, पणन, सार्वजनिक बांधकाम इत्यादी विभाग सोपवण्यात आले. 2016 मध्ये ते महसुल, सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री होते. जुलै २०१९ मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती झाली.
Read also
- खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे..! फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेलेल्या प्रकल्पांची यादीच राष्ट्रवादीने केली जाहीर
- मग मोदीजींसाठी महाराष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे का ? राष्ट्रवादीचा फडणवीसांना सवाल
- “अजूनही वेळ गेलेली नाही”; मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमांबाबत मुख्यमंत्र्यांवर अजित पवारांचा संताप
- “सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या फडणवीसांना तरूणांच्या व्यथा काय समजणार”?; रूपाली पाटलांचा सवाल
- उत्तराखंडमधील अजस्त्र काला नाग पर्वतावर चढाई ; ‘लेक वाचवा’चा दिला संदेश