मुंबई : गेल्या दोन वर्षात राज्याने गुंतवणुकीमध्ये पहिला क्रमांक गमावला आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर गेले. तेथील तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणुक या काळात 23 अब्ज डॉलर्सवर गेली. महाराष्ट्र मात्र 18 अब्ज डॉलर्सवर घसरला. केवळ गुजरातविरोधात भाषणे देऊन चालत नाही. आपल्या राज्यासाठी चांगल्या योजना आखाव्या लागतात. गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही, तो आपला लहान भाऊच आहे. असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये असताना गुजरातला गेलेल्या प्रकल्पाची यादी जाहीर केली आहे.
“रझाकार अन् सजाकारांचा बंदोबस्त मनसे करणार”; राज ठाकरेंचं औरंगाबादच्या ‘मुक्ति’संग्रामाचं पत्र
राष्ट्रवादीचे प्रकव्ते सुरज चव्हाण यांनी यासंदर्भात ट्विट केले आहेत. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेलेले प्रोजेक्ट यामध्ये आयएफएससी सेन्टर मुंबई मधील बीकेसी येथे नियोजित होते ते गुजरातला पळवले. त्यानंतर सेन्टर बोर्ड फॉर वर्कर एज्युकेशन नागपुरला नियोजित होते ते दिल्लीला पळवले. त्यानंतर एमआयएएल ऑफिस मुंबई वरून गुजरातला पळवले.
“गाजरसम्राट देवेंद्र फडणवीसांनी विश्वासहर्ता गमावली”; रूपाली पाटलांचा हल्लाबोल
National Security Guard & National Marine policy Academy पालघर येथे नियोजित होते. ते गुजरात पळवले. Air India office मुंबई मधे होते दिल्ली ला पळवले. Trade mark patent office मुंबई मधे होते दिल्ली ला पळवले. The ship breaking activity मुंबई मधे होते गुजरात ला पळवले. Diamond market मुंबई मधे होते सुरत गुजरात ला पळवले. VedantaFoxconn तळेगावला नियोजित होती गुजरातला पळवले. सांग काम्या देवेंद्र यांच्या माध्यमातून मुंबई व महाराष्ट्राचं महत्व कमी करून गुजरातचा विकास करून घेत आहेत. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“मग यंदाच्या भाऊबीजेला भावाला ओवाळून या, बघा वेदांत परत मिळतोय का? राष्ट्रवादीचा फडणवीसांना सवाल
दरम्यान, गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही असं फडणवीस म्हणतायत मग मोदीजी साठी महाराष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे का ? फडणवीस यांना महाराष्ट्राबद्दल ना आस्था ना प्रेम ते स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी गुजरातच्या चरणी महाराष्ट्र सुद्धा गहाण ठेवायला मागे पुढे पाहणार नाहीत. असा खोचक टोला देखील त्यांनी लगवाला आहे.
Read also
- मग मोदीजींसाठी महाराष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे का ? राष्ट्रवादीचा फडणवीसांना सवाल
- “अजूनही वेळ गेलेली नाही”; मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमांबाबत मुख्यमंत्र्यांवर अजित पवारांचा संताप
- “सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या फडणवीसांना तरूणांच्या व्यथा काय समजणार”?; रूपाली पाटलांचा सवाल
- उत्तराखंडमधील अजस्त्र काला नाग पर्वतावर चढाई ; ‘लेक वाचवा’चा दिला संदेश
- “मराठवाडा मुक्तिसंग्रामचा कार्यक्रम शिंदेंनी 15 मिनिटांत उरकला, अन् शिंदे-सेनेत वाद पेटला”