कोल्हापूर : गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सेनेवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस हे विरोध पक्षात आहेत. विधान परिषद निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आमच्या पक्षावर टीका करण्याशिवाय पर्याय नाही, असं देसाई म्हणाले.
आमच्यावर कितीही टीका झाल्या तरी शिवसेना ही आपल्या विचारांवर ठाम आहे. केवळ महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत, असं शंभूराज देसाई म्हणाले. राज्य सरकार महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत गंभीर आहे. महिला सुरक्षेसाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दिशा कायद्याचं प्रारूप मंजुरीसाठी लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवू, अशी माहिती शंभूराज देसाईंनी दिली.
राज्यपाल सकारात्मक निर्णय घेतील
राज्य सरकारने विधान परिषदेच्या 12 जागांसाठी राज्यपालांकडे पाठवलेल्या यादीवर आक्षेप घेतल्याची माहिती राजभवनाच्या सूत्रांकडून अद्याप मिळालेली नाही. राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार बारा मान्यवरांची शिफारस मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर राज्यपालांच्या कडे करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाने पाठवलेल्या बारा जणांच्या नावांवर राज्यपाल सकारात्मक निर्णय घेतील, अशी आशा शंभूराज देसाईंनी व्यक्त केली.
Read Also :
महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ, देवेंद्र फडणवीसांनी डागली टीकेची तोफ
मुंबई महापालिका निवडणूक : आघाडीतील ‘हा’ पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता!
पाठीत खंजीर खुपसण्यासारख्या गोष्टी आमच्या पक्षात नाही, ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीला टोला
…तर एकाही मंत्र्याला जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही, बोंडअळीच्या प्रश्नावरुन भाजप आक्रमक
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या ‘या’ उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी