नवी दिल्ली : कडाक्याची थंडी आणि पावसाला ही न जुमानता मागील अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहे. तर सरकारने कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीशिवाय कुठल्याही प्रस्तावावर विचार करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे. दुपारी 2 वाजता होणाऱ्या या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.
तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया निश्चित करावी, तसेच किमान आधारभूत मूल्याच्या कायद्याची हमी द्यावी, या दोन प्रमुख मागण्यांवर शेतकरी संघटना अजूनही ठाम आहेत. तर दुसरीकडे, तिन्ही नवीन कृषी कायदे मागे घेण्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रस्तावावर विचार करण्यास सरकार तयार असल्याचे, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आजच्या चर्चेच्या आधी शेतकऱ्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. दिल्लीच्या परिघावरील पूर्व आणि पश्चिम महामार्गावर ५ हजार ट्रॅक्टरसह शेतकरी रस्त्यावर उतरल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला. या ट्रॅक्टर मोर्चाद्वारे दीर्घकाळ आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी संघटनांनी दिला आहे.
Read Also :
- नाशिकमधील भाजपचे मोठे नेते सेनेच्या वाटेवर, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
- ‘ही तर ठाकरे सरकारची रोजचीच बोंबाबोंब’, फडणवीसांचे टीकास्त्र
- हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी वर्णी
- प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा राजकारणात येणार ? म्हणाले…
- ‘औरंगाबाद विमानतळाला अजिंठा-वेरूळ लेणीचे नाव द्या’, आठवलेंची मागणी
- … तर 2014 साली काँग्रेसलाच सत्ता स्थापनेसाठी बोलवले असते, प्रणब मुखर्जींच्या पुस्तकात गौप्यस्फोट