पुणे : पुण्यातील बिबवेवाडीतील हत्याकांडासारख्या घटना रोखायच्या असतील, तर कायद्याचा धाक निर्माण होण्याची गरज असल्याचे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. रविवारी रात्री पाटील यांनी मृत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन, त्यांचे सांत्वन केले. तसेच, भाजपा आपदा कोषच्या माध्यमातून दोन लाखाची आर्थिक मदत देण्यासोबतच, कायदेशीर सर्वतोपरी मदत उपलब्ध करुन देण्याचे कुटुंबियांना आश्वस्त केले.
समीर वानखेडे भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे त्याची पाठराखण करणार नाही – चंद्रकांत पाटील
यावेळी पुणे शहर संघटन मंत्री राजेश पांडे, सुनिल कांबळे, शहर उपाध्यक्ष दिनेश धाडवे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष भीमराव साठे, नगरसेविका आणि प्रभाग समिती अध्यक्ष वर्षा साठे, नगरसेविका रुपाली धाडवे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीवेळी मुलीच्या दिव्यांग भावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना जशी शिक्षा होत होती, तशी शिक्षा हत्याकांडातील आरोपीला व्हावी, अशी मागणी केली. यानंतर पाटील यांनी कुटुंबियांना धीर देत गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, मृत मुलगीच कुटुंबाचा आर्थिक आधार असल्याने, तिच्या हत्येने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत देऊ केली.
दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 3700 कोटी जमा होणार; विजय वडेट्टीवारांची माहिती
यानंतर प्रतिक्रीया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “आघाडी सरकारच्या काळात गुन्ह्यांचा दोषसिद्धी दर फक्त ९ टक्के होता. ही सर्वांसाठी चिंतेची बाब होती. पण माननीय देवेंद्रजींच्या काळात राज्यात कायद्याचा धाक होता. त्यामुळे दोषसिद्धीदर (कनव्हिक्शन रेट) ५३ टक्के इतका होता. पाच वर्षात गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक होता. तेव्हा अशा घटना रोखण्यासाठी कायद्याचा धाक निर्माण होण्याची गरज आहे.” ते पुढे म्हणाले की, पीडित कुटुंबियांच्या पाठिशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जावा. त्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून एक वकील देखील देऊ, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Read Also :
- समीर वानखेडे १०० टक्के मुस्लीमच आहे, हिंदू नाही; मंत्री नवाब मलिकांचा खळबळजनक दावा
- तपास यंत्रणा चुकत असतील तर न्यायव्यवस्था त्यांना फोडून काढेल – सुधीर मुनगंटीवार
- आर्यन खान प्रकरणाचे आणखी १० व्हिडिओ देणार, भाजपचं पितळ उघड पाडणार; संजय राऊतांचा दावा
- समीर वानखेडेंची होणार उचलबांगडी? सहा जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल, उद्या दिल्लीत चौकशी होणार
- डोक फिरलेल्या सरकारला देगलूर-बिलोलीच्या निकालातून शॉक द्या – देवेंद्र फडणवीस