ठाणे : विनयभंगाच्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे. याप्रकरणी भाजपच्या पदाधिकारी रिदा रशिद यांनी आव्हाडांवर गुन्हा दाखल केला होता. आज याप्रकरणी ठाणे कोर्टात सुनावणी झाल्यानंतर दुपारी 3 वाजता न्यायाधीशांनी निर्णय दिला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. यावेळी संबंधित महिलेने राजकीय वैमनस्यातून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात स्पर्श करण्यामागे तसा कोणताही अशील आव्हाड यांचा हेतू नव्हता. मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात गर्दी झाल्यामुळे ती बाजूला करताना त्यांनी बाजूला सरण्यास सांगताना तिला हात लागल असं जितेंद्र आव्हाड यांचे वकिल गजानन चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसा त्यांनी घटनास्थळीचा व्हि़डीओ देखील कोर्टात दाखवला.
“रोज सकाळी 9 वाजता अनेकांचे 12 वाजवणारे अन्…;”रोहित पवारांकडून राऊतांना Birthday च्या हटके शुभेच्छा
मात्र यावर सरकारी वकिल वर्षा चंदने यांनी जामीनीला आक्षेप नोंदवला. अन् फिर्यादी महिलेने हा प्रकार घडल्यानंतर तातडीने मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे सांगून यात राजकीय दबाव नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय आरोपी स्वत: आमदार असल्यामुळे दबाव आणण्याचीही शक्यता आहे. या दोन्ही बाजू एकल्यानंतर न्या. गुप्ता यांनी यावर दुपारच्या सत्रात सुनावणी घेण्याचे जाहीर केले होते.
Read also
- “ज्यांना मंत्रिपद मिळणार नाहीत, ते दुसरी नवरी बघतील”; माजी मंत्र्यांचा खोचक टोला
- कुठं आहे महागाई? ४० हजार रुपयांचा मोबाईल आज 4 हजार रुपयांना मिळतोय
- आव्हाडांच्या पत्नीची महिला आयोगाकडे धाव..! म्हणाल्या, “त्या महिलेवर कायदेशीर करा”
- “भारत जोडो यात्रा मानवतेचा सागर, राहुल गांधी थकतच नाही,”; प्रणिती शिंदे
- “आम्ही ब्राम्हण आहोत, आम्हाला त्याचा गर्व”; अमृता फडणवीस