मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्याने आता आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या प्रकरणावर शिवसेना भाजपवर हल्लाबोल करीत आहेत. तर भाजप देखील शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करीत आहे. यातच आता आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. हनुमान चालिसेला विरोध केल्यामुळेच उद्धव ठाकरे यांचं धनुष्यबाण गेलं असल्याची टिका रवी राणा यांनी केली आहे.
राजकीय लढाई सुरूच..! उद्धव ठाकरेंची आता दिल्ली उच्च न्यायालयात धाव
खासदार नवनीत राणा आणि मला 14 दिवस उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या माध्यमातून तुरूंगात टाकलं. आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसेला विरोध केला. त्यामुळेच प्रभू श्रीराम यांनी उद्धव ठाकरे यांचं धनुष्यबाण हिसकावून घेतलं आहे. हनुमानाने उद्धव ठाकरे यांना हा श्राप दिला आहे म्हणूनच धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्यात आल्याचं रवी राणांनी म्हटलं आहे.
“कधी गाणे, कधी नकला, कधी शिवीगाळ..! विनोदी कलाकार आहेत की मंत्री?”
महाविकास आघाडीचं सरकार असताना नवनीत राणा आणि रवी राणा यांना मातोश्रीसमोर हनुमान चालिसाचं पठणाचा कार्यक्रम गाजला होता. त्या प्रकरणावरून राणा दाम्पत्यांला अटक देखील करण्यात आली होती. तशापासून राणा दाम्पत्य हे हनुमान चालिसेच्या मुद्दांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. तसेच ते विविध प्रकरणावरून सातत्याने टिका करीत आहेत.
Read also
- “बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हॅक झाल्याने मला अतिव दु:ख”; सुधीर मुनगंटीवार
- “उद्धवजी तुम्ही लढा..आम्ही आहोत तुमच्यासोबत”; काॅंग्रेसचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा
- “नावात काय आहे ? शिवसेना हे नाव जरी गोठवलं तरी..;” संजय राऊतांचं स्पिरीट
- “कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह यादव”; भाजप नेत्याचं वादग्रस्त ट्विट, नागरिकांकडून संताप
- “शिंदे गटाने सुचवलेल्या तीन नावांत बाळासाहेबांचा उल्लेख”; आज फैसला होणार?