मुंबई : गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आज कोणताही दिलासा न देता न्यायालयाने त्यांच्या जामीन याचिकेवर पुढील सुनावणी 17 तारखेला सुनावली आहे. म्हणजे संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी आणखीन 7 दिवसांनी वाढविली आहे. याच दरम्यान त्यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर संजय राऊतांनी नवीन चिन्ह हे कदाचित शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. असं वक्तव्य केलं आहे. एखादं चिन्ह गोठवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. इंदिरा गांधी देखील अशाच परिस्थितीला समोरं गेल्या होत्या. काॅंग्रेसचं चिन्ह तर तीनवेळा गोठवलं गेलंय. जनता दलाचंही चिन्ह गोठवण्यात आलं होतं. असंही ते म्हणाले.
“….तर आपण आगामी निवडणुकीत १०० आमदार निवडून आणू शकतो”
नावात काय आहे ? शिवसेना हे नाव जरी गोठवलं तरी खरी शिवसेना कोणाची? हे सर्वांना ठाऊक आहे. अंधेरी पुर्वच्या पोटनिवडणुकीपुर्वी धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला इतक्या सहजासहजी मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक संताप व्यक्त केला जात आहे. असंही ते म्हणाले.
“बाळासाहेबांनी हिंदू म्हणण्याची हिमंत तुम्ही गोठवली”; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
दरम्यान, संजय राऊत यांची रवानगी पुन्हा एकदा तुरूंगात करण्यात आली आहे. आजच्या सुनावणीत इडी तर्फे एसीजी अनिल सिंह यांनी आपला युक्तिवाद सुरू केला होता. त्यामध्ये पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना जामीन देण्यास तपासयंत्रणेचा विरोध असल्याचे दिसून आले आहे.
Read also
- “कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह यादव”; भाजप नेत्याचं वादग्रस्त ट्विट, नागरिकांकडून संताप
- “शिंदे गटाने सुचवलेल्या तीन नावांत बाळासाहेबांचा उल्लेख”; आज फैसला होणार?
- राजकीय लढाई सुरूच..! उद्धव ठाकरेंची आता दिल्ली उच्च न्यायालयात धाव
- “कधी गाणे, कधी नकला, कधी शिवीगाळ..! विनोदी कलाकार आहेत की मंत्री?”
- अब्दुल सत्तारांची सचिवाला शिवीगाळ..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज