मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे दोन्ही गोठवल्याने याचा मोठा फटका उद्धव ठाकरे अन् शिंदे गटाला बसला आहे. आज निवडणुक आयोग या दोन्ही गटाने सादर केलेल्या तीन निवडणुक चिन्हांपैकी एक चिन्ह आगामी निवडणुकीसाठी देणार आहे. चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे बंडखोर आमदारांवर आगपाखड करत प्रखर शब्दात टिका केली. तसेच त्यांनी निवडणुक आयोगाला सुचवलेली नावं देखील काल जाहीर केली.
“पक्षाचा अशाप्रकारे प्रचार करा की पुढचे सरकार राष्ट्रवादीचेच असेल”
कालचा निवडणुक आयोगाने दिलेला निकाल अपेक्षित नव्हता. आम्ही निवडणुक आयोगाला कालच पत्र पाठवून तीन चिन्हे आणि नावे दिली आहेत. लवकरच अंधेरीची पोटनिवडणुक होत आहे. या निवडणुकीसाठी आम्हाला चिन्ह आणि नावाची गरज आहे. माझी आयोगाला विनंती आहे की, त्यांनी लवकरच लवकर याबाबात निर्णय घ्यावा. असं काल उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी 10 कोटी रूपये आले कुठून ? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
बंडखोर आमदारांवर टिका करताना ठाकरे म्हणाले की, ज्या शिवसेनेने मराठी माणसाला आधार दिला, मराठी मने पेटवली आणि हिंदू अस्मिता जपली, तिचा घात करायला निघालात. शिवसेना हे पवित्र नाव गोठवलं. या देशात हिंदू म्हणायची कुणाला हिमंत नव्हती, तेव्हा बाळासाहेबांनी ती दिली. ती हिमंत तुम्ही गोठवली. मुळामध्ये तुमचा आणि शिवसेनेचा संबंध काय ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
“तर मग दलित व महिला सरसंचालक नियुक्त कधी होणार ?”काॅंग्रेसचा संघाला सवाल
काल शिवसेना नाव गोठवले. धनुष्य बाण गोठवले. राग आला पण दुख होत. ज्या शिवसेनेनं जन्म दिला. त्या आईच्या काळजात कट्यार घुसवली. शिवसेना जे पवित्र नाव गोठवलं. त्याच्या मागे जी महाशक्ती आहे त्यांना जास्त आनंद होत असेल की, त्याची लोक फोडून करून दाखवलं. असं म्हणत असतील. जे नाव माझ्या आजोबांनी दिलं, माझ्या वडिलांना रूजवलं आणि तेच विचार घेऊन मी पुढे जात असताना तुम्ही त्याचा घात करता आहात. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यांचं निधन; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- पिंपरी-चिंचवडमध्ये आज ‘हाय होल्टेज पॉलिटिकल डे’
- “सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड घेत होते”; राहुल गांधींचं खळबळजनक वक्तव्य
- अंधेरीची जागा शिवसेनेची आहे, तरी शिंदे गटाचा भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यास अधिक रस
- शिंदे गटाकडून 1 लाख तर ठाकरेंकडून 10 लाख शपथपत्र दाखल..! धनुष्यबाणासंदर्भात आयोगाचा निकाल?