मुंबई : शिवसेनेने अतिशय योग्य पद्धतीने आणि व्यवस्थित कागदपत्र सादर केल्याने निवडणुक आयोगाकडे शिवसेनेची बाजू खुप भक्कम आहे. त्यामुळे धनुष्यबाण हा आम्हाला मिळणार आहे. तसेच जर अंधेरी पुर्व विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपने आपला उमेदवार दिला आहे. यावेळी शिंदे गटाचा उमेदवार नसून त्यांना भाजपचा उमेदवार निवडून येण्यास त्यांनी अधिक रस दाखवला आहे. असं वक्तव्य शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे.
“भाजप सत्तेच्या माध्यमातून भष्ट्रचार, भय, भूक निर्माण करतंय”
तसेच बंडखोर आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यावर देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांनी तर सुरूवातीला असं म्हटलं आहे की, जर 40 आमदार निवडून आले नाहीत तर गावाकडे जाऊन शेती करेन. तसेच ते नेहमी म्हणातेत की आमची हिंदूत्वाची भूमिका लोकांना पटली आहे. आमच्या मतदार संघातील लोक आमच्याबाजूने आहेत. मग हे सुरक्षा का मागत आहेत. ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
“दहा कोटी रूपये कुठून आले? शिंदेसाहेब, हा महाराष्ट्र आहे;” अजित पवारांचा इशारा
चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील या कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आम्ही अडीच वर्ष नियोजन करीत होतो. तसंच मोदी आणि अमित शहा यांच्याबाबत देखील त्यांनी वक्तव्य केलं. त्यावरून मातृदेवो भव: पितृदेवो भव: हे संस्कार हिंदू धर्मात सांगितले आहेत. तरीही चंद्रकांत पाटील हिंदू धर्माच्या विपरीत कसे काय बोलले ? असा खोचक सवाल शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चंद्रकांत पाटलांना केला आहे.
Read also
- शिंदे गटाकडून 1 लाख तर ठाकरेंकडून 10 लाख शपथपत्र दाखल..! धनुष्यबाणासंदर्भात आयोगाचा निकाल?
- “पक्षाचा अशाप्रकारे प्रचार करा की पुढचे सरकार राष्ट्रवादीचेच असेल”
- मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी 10 कोटी रूपये आले कुठून ? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
- “तर मग दलित व महिला सरसंचालक नियुक्त कधी होणार ?”काॅंग्रेसचा संघाला सवाल
- “मोहन भागवतांनी नुसतं माफी मागून चालणार नाही, तर..”; शरद पवार