मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलची राज्यस्तरीय बैठक आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय, मुंबई येथे घेण्यात आली. या राज्यस्तरीय बैठकीला जयंत पाटील यांनी संबोधित केले. गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर सेल काम करत आहे. अनेक नवनवीन उपक्रम राबवून डॉ. नरेंद्र काळे यांनी ही संघटना वाढवली, आता डॉ. सुनील जगताप हे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. तेही त्याच जोमाने काम करतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.
“या गोष्टींना जर बळ दिलं, तर मला खात्री..;” मोहन भागवतांच्या वक्तव्यांनंतर पाटलांची प्रतिक्रिया
पुढे ते म्हणाले, डॉक्टर, वकील हा शिक्षित वर्ग लोकांचे मत परिवर्तन करू शकतो. मधल्या काळात आपल्या डॉक्टर सेलने अतिशय चांगली कामगिरी केली, कोविडच्या काळात काम केले, मोफत शिबिर घेऊन सामान्य लोकांना मदत केली. सरकार असो नसो आपण लोकांची कामे केली. आता लोकांमध्ये जा, पक्षाचा अशाप्रकारे प्रचार करा की पुढचे सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच असेल. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला तर आपण १०० आमदार निवडून आणू शकतो. आपला लढा हा सरकार स्थापन करण्यासाठी नाही तर विचार टिकवण्यासाठी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज या महापुरुषांनी महाराष्ट्राला जो पुरोगामी विचारांचा वारसा दिला आहे. लोकशाही मुल्यांचा विचार दिला आहे, त्याची जपणूक आपल्याला करायची आहे. हे करण्यासाठी आपल्याला उत्स्फूर्तपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच तयार करायला हवा. जास्तीत जास्त डॉक्टर्स आपल्या संघटनेशी कसे जोडता येईल याची काळजी घ्यावी, असे मार्गदर्शन जयंत पाटील यांनी केले.
“धनुष्यबाणाचं भवितव्य निवडणुक आयोगाच्या हाती..!” शरद पवारांचं सुचक वक्तव्य
दरम्यान डॉक्टर सेलच्यावतीने महाराष्ट्रातील डॉक्टरांसाठी ८८८८१५०१०१ या आपत्कालीन नंबरचे अनावरण प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. संतोष दाभोळकर, प्रदेश सरचिटणीसपदी डॉ. योगेश बेंद्रे, प्रदेश सरचिटणीसपदी डॉ. राजेश हिंगोले, औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी डॉ. विश्वास साळुंखे, रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी रणजित पाटील आदींची नियुक्ती करण्यात आली.
नाशिक बस अपघात…! अपघातातील नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्री
या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या बैठकीला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, डॉ. संजय लोंढे, डॉ. विजय जाधव, डॉ. योगेश गोसावी, डॉ. धर्याशील पवार, डॉ. शिवदीप उंद्रे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Read also
- मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी 10 कोटी रूपये आले कुठून ? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
- “तर मग दलित व महिला सरसंचालक नियुक्त कधी होणार ?”काॅंग्रेसचा संघाला सवाल
- “मोहन भागवतांनी नुसतं माफी मागून चालणार नाही, तर..”; शरद पवार
- “भाजप सत्तेच्या माध्यमातून भष्ट्रचार, भय, भूक निर्माण करतंय”
- “दहा कोटी रूपये कुठून आले? शिंदेसाहेब, हा महाराष्ट्र आहे;” अजित पवारांचा इशारा