मुंबई : शिवसेनेच्या निवडणुक चिन्हाची लढाई आता निवडणुक आयोगाकडे गेली आहे. शिवसेनेच्या निवडणुक चिन्हासंदर्भात आज उद्धव ठाकरे यांनी कागदपत्रे सादर करण्याची वेळ आज संपत आहे. त्यामुळे निवडणुक आयोग आता काय निर्णय घेणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी निवडणुक आयोगाकडे धनुष्यबाणासंदर्भात महत्वाची मागणी केली आहे.
“दहा कोटी रूपये कुठून आले? शिंदेसाहेब, हा महाराष्ट्र आहे;” अजित पवारांचा इशारा
आज शिवसेनेच्या वतीने सातशे पानांचा गट्टा निवडणुक आयोगकडे सोपवण्यात आला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी निवडणुक आयोगाकडे तीन दावे देखील केले आहेत. चिन्हाबाबत निर्णय घ्यायला आणीबाणीची स्थिती नाही. पोटनिवडणुकीत उमेदवारच उतरवणार नाहीयत तर मग चिन्ह का मागत आहेत. रिक्त जागेवर आधी आमचाच उमेदवार असल्याने चिन्हाबाबत अंतिम निर्णय होई पर्यंत जैसे थे स्थिती ठेवा असा उद्धव ठाकरे गटाने दावा केला आहे.
“या गोष्टींना जर बळ दिलं, तर मला खात्री..;” मोहन भागवतांच्या वक्तव्यांनंतर पाटलांची प्रतिक्रिया
तसेच केंद्रीय निवडणुक आयोगाकडे आज शिंदे गटाने आतापर्यंत 1 लाख 60 हजार प्राथमिक सदस्यांची शपथपत्र दाखल केली आहेत. हा आकडा 7 लाखांपर्यंत नेण्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडून जवळपास 10 लाख शपथपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
“धनुष्यबाणाचं भवितव्य निवडणुक आयोगाच्या हाती..!” शरद पवारांचं सुचक वक्तव्य
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वकिलांच्या दाव्यानंतर निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका आता कुणाला जाणार त्याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे.
Read also
- “पक्षाचा अशाप्रकारे प्रचार करा की पुढचे सरकार राष्ट्रवादीचेच असेल”
- मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी 10 कोटी रूपये आले कुठून ? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
- “तर मग दलित व महिला सरसंचालक नियुक्त कधी होणार ?”काॅंग्रेसचा संघाला सवाल
- “मोहन भागवतांनी नुसतं माफी मागून चालणार नाही, तर..”; शरद पवार
- “भाजप सत्तेच्या माध्यमातून भष्ट्रचार, भय, भूक निर्माण करतंय”