नवी दिल्ली : माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ब्रिटिशांना मदत केलेली आहे. त्यावेळी सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड घ्यायचे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाजप कुठेही नव्हती. हे सत्य भाजप लपवून ठेऊ शकत नाही. काॅंग्रेस आणि काॅंग्रेसच्या नेत्यांनीच भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. असं वक्तव्य काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलं आहे.
“मोहन भागवतांनी नुसतं माफी मागून चालणार नाही, तर..”; शरद पवार
सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर आहेत. ते कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास करत असून भारत जोडो यात्रेला आज एक महिना पुर्ण झाला आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधत आहेत. कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. तसेच ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेऊन देशातील राजकीय परिस्थितीबाबत भाष्य करीत आहेत. याच दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
“भाजप सत्तेच्या माध्यमातून भष्ट्रचार, भय, भूक निर्माण करतंय”
राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेले विधान पाहता त्यांच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटते. तसेही ते भारतात फारसे नसतात. अचानक कुठे परदेशी जातात हे काॅंग्रेसवाल्यांनाही माहिती नसते. आता भारतात आहेत तर देशाबद्दलचे अज्ञान दाखवीत आहेत. अशी टिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
“दहा कोटी रूपये कुठून आले? शिंदेसाहेब, हा महाराष्ट्र आहे;” अजित पवारांचा इशारा
दरम्यान, पुढे बोलताना बावनकुळेंनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टिका केली आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे. शेवटी ठाकरे हे महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे एक गटनेते आहेत. यानिमित्ताने त्यांची भूमिका जनतेला कळून चुकेल. तसेच सावरकर यांच्या प्रखर देशभक्तीबद्दल प्रत्येक भारतीयाला आदर आहे. सावरकरांनी देशासाठी केलेल्या असीम त्यागाबद्दल राहुल गांधी यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी देश तोडण्याचे काम करीत आहेत. असंही ते म्हणाले.
Read also
- अंधेरीची जागा शिवसेनेची आहे, तरी शिंदे गटाचा भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यास अधिक रस
- शिंदे गटाकडून 1 लाख तर ठाकरेंकडून 10 लाख शपथपत्र दाखल..! धनुष्यबाणासंदर्भात आयोगाचा निकाल?
- “पक्षाचा अशाप्रकारे प्रचार करा की पुढचे सरकार राष्ट्रवादीचेच असेल”
- मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी 10 कोटी रूपये आले कुठून ? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
- “तर मग दलित व महिला सरसंचालक नियुक्त कधी होणार ?”काॅंग्रेसचा संघाला सवाल