पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणूका फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने बालेकिल्ला पुन्हा हस्तगत करण्यासाठी ऐन निवडणूकीच्या तोंडावर पार्थ पवार अधिक सक्रीय व आक्रमक झाले असतानाच राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचारासह शहरातील इतर प्रश्नांतही लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. परंतू, राष्ट्रवादीचे महापालिका निवडणुकीतील नेतृत्व कोण करणार? यात कोणतीही स्पष्टता दिसून येत नव्हती. त्यातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी चिंचवडचा दौरा सुरू केला. या वेळी पवार त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना त्यांच्या स्टाईलने उत्तरे दिली. पिंपरी चिंचवडच्या नेतृत्वाबद्दल शरद पवारांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांची नावे घेतल्याने भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना डच्चू मिळण्याची शक्यता दिसून येत आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार दोन दिवसीय पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, पिंपरी चिंचवडचा सेनापती कोण असणार, त्यावर पवार म्हणाले, पक्षाचे धोरण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठरवतील. येथील पक्षाचे अध्यक्ष, आमदार आणि खासदार ठरवतील सेनापती कोण असणार आहे. त्याच बरोबर महाविकास आघाडी होईल का, यावर पवार म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार का याबाबत मी काही सांगू शकत नाही. या तीन पक्षाचे राज्याचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. ते योग्य आहे की नाही ते मला विचारतील, माझे मत नाही, तर माझा आदेश येईल. त्यावेळी मी त्यांच्या कानात सांगेन तुम्हाला सांगणार नाही, असे पवार म्हणाले.
एकतर हे वसुली सरकार नोकर भरती काढत नाही, काढली तर असा गोंधळ घालतं – गोपीचंद पडळकर
पिंपरी-चिंचवड शहरावर राष्ट्रवादीने वर्षानुवर्षे पवारांनी सत्ता गाजवली. मात्र, महापालिकेच्या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला अन् भाकरी फिरवली. आता पिंपरी-चिंचवड पुन्हा काबिज करण्यासाठी पार्थ पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी टि्वट करत महापालिकेतील भ्रष्टाचारावर भाष्य केले होते ते की ”सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।” त्यामुळे पिंपरी महापालिकेची सर्व सुत्रे पार्थ पवार यांच्या हातात असतील असे बोलले जात होते. मात्र, खुद्द शरद पवार यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांची नावे सांगितली आहेत. त्यामुळे नेतृत्वाच्या लढाईत विलास लांडे यांना राष्ट्रवादीकडून डच्चू मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात माझा किंचीत हात होता; शरद पवारांची दिली कबुली
सन २०१९ विधानसभेच्या निवडणूकीत देशात मोदी लाट मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्षांना घरघर लागली. अनेक राजकीय पक्ष निवडणुकीबाबत चिंतेत होती. अशा अडचणीच्या काळात पक्षात निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा कस लागतो. विलास लांडे हे राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावंत तर आहेतच शिवाय पक्षाच्या जीवार नगरसेवक, महापौर व आमदार अशी महत्वाची पदे उपभोगली असताना २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत पक्षाच्या बरोबर राहणे आवश्यक होते. मात्र विलास लांडे यांनी तसे न करता २०१९ ची निवडणूक अपक्ष लढविली. त्यामुळे भोसरीचे विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष मोठ्या प्रमाणात बॅक फुटवर गेला असल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उघड बोलू लागले आहेत. एका बाजूला लांडे यांनी भोसरी विधानसभेची राष्ट्रवादी उमेदवारी नाकारणे व दुसऱ्या बाजूला मोदी लाट त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची मोठी हानी झाल्याचे बोलले जात आहे.
साहेब, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना – चित्रा वाघ
शरद पवार देशाच्या राजकारणात सक्रिय झाल्यावर अजित पवार यांच्याकडे पिंपरी शहराची सूत्र आली. अजित पवारांनीही आपल्या कामाची छाप विकासकामांच्या माध्यमातून उमटवली. या काळात अनेक जुनेजाणते नाराज झाले. 2017 च्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपशी घरोबा केला. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली. त्यानंतर मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता पिंपरी-चिंचवड महापालिकेची जबाबदारी घेण्यासाठी ते पुढे आलेले आहेत. मात्र, त्यांच्या जबाबदारीवर अजून अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही, असे आजच्या वक्तव्यावरुन दिसून येते.
Read Also :
- नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये देशात अशा घटना घडतील की, आश्चर्य वाटेल – प्रकाश आंबेडकर
- ‘यारी दोस्ती’, पार्थ पवारांसोबतचा फोटो शेअर करत खासदार खासदार सुजय विखे म्हणतात…
- मिशन २०२२साठी भाजपचा मेगाप्लॅन; नागपुरात नितीन गडकरी- देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये
- शरद पवारांचा एकेरी उल्लेख; राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटलांना ‘नवरत्न’ तेलाची बाटली भेट!
- केंद्र सरकार महावितरणचं खाजगीकरण करण्याच्या तयारीत? ऊर्जा राज्यमंत्र्यांचं खळबळजनक विधान