मुंबई : मागील काही दिवसापासून सुरू असलेला रवी राणा आणि बच्चू कडू वाद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मधस्थीने संपुष्टात आला. यातच आज पत्रकार परिषदेत देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य़ केलं. तसेच बच्चू कडू यांना गुवाहाटीला जाण्यास मीच सांगितले असल्याचं देखील फडणवीसांनी सांगितलं. यावर आता राष्ट्रवादीचे युवा नेते सुरज चव्हाण यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का जातो? पंतप्रधानांचा विचार विशाल असायला हवं”; राज ठाकरे
50 खोके घेतले म्हणून बच्चू कडूचे रवी राणा यांनी फक्त वरचे कपडे काढले होते. बच्चू कडूंना गुवाहाटीला जायला मीच सांगितले होतं. म्हणत फडणवीसांनी तर बच्चू भाऊंचे अंतर्वस्त्रच काढले. असं म्हणत राष्ट्रवादीने फडणवीसांना डिवचलं आहे. तसेच पुढे बोलताना सुरज चव्हाण म्हणाले की, जवळपास 2 लाख कोटीची गुंतवणुक राज्याबाहेर गेली. त्यावेळी उत्तर द्यायला उदय सामंत आणि राज्यात 400 कोटी गुंतवणुक येणार आहे. म्हणून सांगायला देवेंद्र फडणवीस. फडणवीसांचं सांगणं म्हणजे लबाडाचं आवतण. जेवल्याशिवाय खरं नाही. असा टोला देखील त्यांनी लगावला.
“शरद पवार यांची तब्बेत बिघडली..! ब्रीच रूग्णालयात दाखल
दरम्यान, बच्चू कडू माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. त्यांना मी स्वत: फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचं आहे. तुम्ही आम्हाला हवे आहात आणि आमची अशी इच्छा आहे की, तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं. माझ्या एका कॉलवर ते गुवाहाटीला गेले. त्यामुळे बच्चू कडूंनी कुणाशी सौदा केला, काही उलटसुलट केलं. असा आरोप करणं चुकीचं आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गुवाहाटीला जाण्यासाठी बच्चू कडू यांनी 50 खोके घेतल्याचा आरोप अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला. त्यावर रवी राणांनी 1 नोव्हेंबर पर्यंत पुरावा द्यावा असं म्हणत बच्चू कडूंनी देखील राणांच्या विरोधात रण शिंकले होते. त्यानंतर हा वाद राज्यात बराच चर्चेला आला. यानंतर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. तर रवी राणांनी बच्चू कडू यांची जाहीर माफी मागितली.
Read also
- आंदोलकांचा फडणवीसांकडून ‘शेंबडी पोरं’ म्हणून उल्लेख..! आदित्य ठाकरे म्हणाले….
- फडणवीसांनी कागदपत्रासह पुरावे दाखविले; ठाकरेंनी थेट ‘वन टू वन’ करण्याचं दिले आव्हान
- “माजले होते बोके, कोरोनात खाऊन खोके, आता होणार चौकशी ओके”; शेलारांचा टोला
- 12,000,00,00,000…! या आकड्याची आता CAG कडून चौकशी: चित्रा वाघ यांनी सेनेला डिवचलं
- “काळजी करू नका..! मोदींनी महाराष्ट्राला 2000 कोटींची भेट दिली”; देवेंद्र फडणवीस