मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयावर मागील काही काळात एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने मिळून कारवाई केली होती. या कारवाईमध्ये नंतर काही निष्पन्न न झाल्याने नवाब मलिक हे समीर वानखेडेंच्या विरोधात एकामागून एक पुरावे गोळावे करत होते.
तुम्ही शिवसेनेचं बोट धरुनच मोठे झालात, हे विसरु नका – शंभुराज देसाई
यामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. नवाब मलिक यांनी वानखेडेंच्या संपूर्ण कुटुंबाची पत्रिका काढत त्याच्यावर विविध आरोप केले आणि त्यांना न्यायालयात खेचलं. काल कोर्टात झालेल्या सुनावणीत नवाब मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांची बिनशर्त माफी मागितली आणि पुन्हा त्यांच्याविरोधात काही बोलणार नाही असं देखील म्हटलं होतं. हे सर्व झाल्यानंतर नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा सूचक ट्विट करत खळबळ माजवून दिली आहे. प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अजित पवारांचे नातेवाईक, हसन मुश्रीफ, भावना गवळी आणि अर्जुन खोतकर, प्राजक्त तनपुरे या महाविकास आघाडीच्या नेत्यांनतर आता ईडीचे लक्ष नवाब मलिक हे आहेत असंच त्यांच्या ट्विटमधून त्यांना सांगायचं आहे.
साथियों, सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है.
डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है,
गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 10, 2021
नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, आमच्या घरी लवकरच सरकारी पाहुणे येणार आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतो. भीत-भीत जगणं म्हणजे मरणं होय. आम्हाला भ्यायचं नाही तर लढायचं आहे. गांधींजी गोऱ्या लोकांशी लढले, आता आम्ही चोरांशी लढू. नवाब मलिकांनी मागील काही काळात आर्यन खान प्रकरणावरून थेट राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे आता लवकरच नवाब मलिकांचा नंबर लागणार आणि त्यांच्यावर ईडीची धाड पडणार अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. आता ही शक्यता खरी होते का हे येणारा काळच सांगेल.
Read Also :
- ३०० ते ४०० गाड्यांचा फौजफाटा घेऊन एमआयएम धडकणार मुंबईमध्ये
- …तर भाजप आम्हाला फार दुर नाही; राष्ट्रवादीचा शिवसेनेला गर्भित इशारा
- कल्याणमध्ये शिवसेनेला खिंडार?; माजी आमदार भाजपच्या वाटेवर?
- अनिल परबांकडून ‘त्या’ दहा हजार एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा..!
- विधान परिषदेत कोणाची बाजी? अकोला नागपूरमध्ये शिवसेना भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला