सातारा : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फलटणच्या कार्यक्रमात जोरदार निशाणा साधला होता. ‘देशाच्या राजकारणात जायचं असेल तर, घराच्या बाहेर पडावं लागतं.’ अशा पद्धतीची टीका त्यांनी मुख्यमंत्र्यावर केली होती. आता त्यांच्या याच टीकेला गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलताना शंभुराज देसाई यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवला आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या या आरोपांना कोणताही आधार नाही. तसंच चंद्रकांत पाटील हे सगळं त्यांना आलेल्या नैराश्यातून बोलत असून वेगवेगळ्या वल्गना करत आहेत.’ असं म्हणत शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मोठी बातमी : एसटीच्या १० हजार कर्मचाऱ्यांवर आज निलंबनाची कारवाई
‘तुमचे महाराष्ट्रात निवडून आलेले खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आले आहेत. त्यामुळं आमच्यावर असे आरोप करु नका.’ असंही शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी चंद्रकांत पाटलांना ठणकावून सांगितलं आहे.’महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंच बोट धरुनच भारतीय जनता पक्ष पुढं आला आहे हे विसरु नका. बाळसाहेब ठाकरेंच बोट धरुनच ग्रामीण भागात तुमचा पक्ष वाढलाय हे माहती करुन घ्यायचं असेल तर अडवाणींना विचारा.’ असा सल्ला सुद्धा त्यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.
काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलला; अपक्ष उमेदवार आणि बावनकुळेंमध्ये थेट लढत होणार!
‘महाराष्ट्रात भाजपाची आत्ताची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीचं विस्मरण झालं का?’ असा सवालही शंभुराज देसाई यांनी केला आहे.’आमच्या 18 खासदारांवर तुम्ही बोलू नका. निवडणुकीत युती असल्यामुळं प्रत्येकानं प्रत्येकाला मदत केल्यामुळंच दोघांचे खासदार निवडून आले आहेत. शिवसेनेच्या जीवावर सुद्धा भाजपाचे खासदार निवडुन आलेत हे विसरु नका. आता पुढच्या निवडणुकीत शिवसेना भाजपाला जागा दाखवून देईल. असा इशाराही शंभुराज देसाई यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
Read Also :
- विधानपरिषद निवडणुकीत पक्ष तटस्थ, तरीही बसपाचे दोन नगरसेवक मतदानाला! कोणासाठी?
- “मनसे गळकं घर”; औरंगाबाद मनसेत भूकंप! पदाधिकारी शिवसेनेत..!
- “त्यांना जातीयवादाची काविळ झालीये”; अमोल कोल्हेंनी सुनावलं
- कोट्यवधींची संपत्ती असणारे प्रविण दरेकर मजूर कसे? संभाजी भोसलेंचा आक्षेप
- विधानपरिषदेचे १७ आमदार होणार निवृत्त; महाराष्ट्रात पुन्हा एकदा बदलणार राजकीय गणिते