पुणे – मागील आठवड्यात खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्याच्या विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांची चित्र दिसत नसल्याने त्यांनी याबाबत सोशल मिडीयावर प्रश्न विचारला होता. ‘पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रे, पण शिवरायांचा इतिहास का नाही’, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यासाठी त्यांनी पेंटिंग्जसोबतचा सेल्फी आणि एक फोटोही ट्विट केला होता. यावरुन अनेकांनी त्यांच्यावर जातीवाचक चष्म्यातून बघत असल्याची टिका केली. मात्र या सगळ्या टिकाकारांना आता त्यांनी पुन्हा एकदा सोशल मिडीयामधूनच “जातीयवादाची काविळ झाली असल्याचे” सुनावत उत्तर दिले आहे.
पळून गेलेल्या गुन्हेगाराला सुप्रीम कोर्ट अटकेपासून वारंवार संरक्षण का देताय? खासदार अरविंद सावंत
आपल्या ट्विटर पोस्टमध्ये डॉ. अमोल कोल्हे म्हणतात, गेल्या आठवड्यात पुणे विमानतळावर पोहचल्यानंतर माझं लक्ष काही पेंटिंग्जने वेधले. ज्या पुणे जिल्ह्यात किल्ले शिवनेरीवर रयतेचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्यांचे कर्तृत्व का दिसत नाही, अशी भावना ट्विटमधून व्यक्त केली होती. तसेच या संदर्भात एक व्हिडीओ प्रसारित करुन माझी भूमिका स्पष्ट केली होती.
मात्र या पोस्टवर काही जणांनी जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. त्यामुळे हे सर्व प्रकरण दुर्दैवी व अत्यंत लाजीरवाणे आहे असे वाटते. खरंतर प्रत्येक गोष्टीकडे आपण जातीयवादाच्याच समीकरणातून पाहणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी म्हणून मी जे निरीक्षण केले, त्याबद्दल भूमिका मांडली. कारण कोणत्याही शहरातील, जिल्ह्यातील विमानतळ हे पर्यटनाचे केंद्रबिंदू असते.
एक सोपा आणि साधा संकल्प पूर्ण करणार का? पंकजा मुंडेंचे भावनिक पत्र व्हायरल
त्यामुळे त्या भागातील महत्वाच्या अशा सर्वच प्रतीकांचे समान रिप्रेझेंटेशन व्हावे ही भूमिका होती. आपल्या पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान व छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान व बलिदान स्थळ आहे. किल्ले सिंहगड, किल्ले पुरंदर, किल्ले राजगड असा ऐतिहासिक वारसा आहे.
त्याचबरोबर अनेक धार्मिक, सांस्कृतिक व महत्त्वाच्या वास्तू व लोककला आहेत यांचेही रिप्रेझेंटेशन विमानतळावर व्हावे हा निर्मळ हेतू यामागे होता. यात कोणताही जातीवाद येत नाही व ज्यांना दिसत असेल त्यांचा हेतू स्पष्ट नाही किंवा त्यांना जातीवादाची कावीळ झाली आहे असे म्हणावे लागेल, अशी टिकाही अमोल कोल्हे यांनी केली आहे.
Read Also :
- कोट्यवधींची संपत्ती असणारे प्रविण दरेकर मजूर कसे? संभाजी भोसलेंचा आक्षेप
- विधानपरिषदेचे १७ आमदार होणार निवृत्त; महाराष्ट्रात पुन्हा एकदा बदलणार राजकीय गणिते
- काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलला; अपक्ष उमेदवार आणि बावनकुळेंमध्ये थेट लढत होणार!
- पाच नाही तर पंचवीस वर्षे महाराष्ट्रात ठाकरे सरकार टिकणार; खासदार सुप्रिया सुळेंचा दावा
- नवाब मालिकांनंतर आता ‘यांना’ वानखेडे कुटुंबीयांनी ओढले न्यायालयात