बीड : स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा आता जाहीर करण्यात आल्या आहेत. यावरून संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण चांगलेच पेटलेले दिसत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष यांच्यात चांगलाच संघर्ष बघायला मिळणार आहे.
जळत्या हेलिकॉप्टरमधून 3 जणांनी उड्या मारल्या; प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम…
बीडमध्ये देखील राजकीय वातावरण पेटलेले आहे. त्यातच आता भारतीय जनता पक्षाचे फायरब्रॅन्ड नेते आणि स्वर्गीय. गोपीनाथ मुंडे यांची जयंती तोंडावर आली आहे. १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांची जयंती असते. दरवर्षी मुंडेंच्या जयंती निमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रम कार्यकर्त्यांकडून केले जातात.
हेलिकॉप्टर दुर्घटनेत माजी लष्करप्रमुख बिपीन रावत यांचा अखेर मृत्यू
यावर्षीच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या आधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वहस्ताक्षरात लिहिलेले पत्र कमालीचे व्हायरल होत आहे. १२ डिसेंबर रोजी आपण एक साधा आणि सोपा संकल्प करणार आहोत तो साध्य करणार का? असा सवाल देखील त्यांनी पत्राच्या माध्यमातून विचारला आहे. १२ डिसेंबर नंतर पकंजा मुंडे महाराष्ट्रात काही मोठी राजकीय घडामोड घडून आणणार की काय ? असा सवाल राजकीय जाणकारांना पडला आहे.
पंकजांच्या पत्रात लिहिलंय असं काही…………………………
दरवर्षी १२ डिसेंबर, ३ जून आणि ‘दसरा’ हे ‘तीन’ दिवस..आपला वचिंतांचा मेळा न चुकता अधिक शक्तीने होतो. याच संपूर्ण श्रेय, तुम्हाला निस्सिम प्रेम करणाऱ्यांनाच जातं. तुमच्या एवढं सच्च अनोखं नात माझ्या जीवनात कोणतंही नाही.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 8, 2021
प्रत्येक वर्षी गर्दी, मार्गदर्शन, अनेक सामाजिक उपक्रम आपण घेतो. सामुदायिक विवाह सोहळा, महाआरोग्य शिबीर, अपंग- दिव्यांग सेवा, रक्तदान शिबीर, कोविड सेंटर, अतिवृष्टीसाठी मदत फेरी.. अनेक कार्यक्रम आपण केले, अनेक मान्यवर मा. अमित शहा, मुख्यमंत्री, अनेक ‘केंद्रीय मंत्री’, ‘छत्रपती’ सर्व गडावर आले. गोपीनाथ गडावर संघर्ष ‘उत्थान दिन’ साजरे झाले.
सायबेरियन पक्ष्यांप्रमाणे काही ‘पक्षी’ कोलकात्याहून येतात, काही दिल्लीहून येतात…
अनेक दुःखी कुटुंबियांना मदत केली,अनेक रुग्णांचे इलाज झाले. खुप आशिर्वाद कमवले, हे आशिर्वाद काही कमवण्यासाठी नव्हतेच मुळी..,हे चुकीच्या गोष्टी सुधारणं असतील, सुधारण्यासाठी नाही तर त्या गोष्टी आणि प्रवृतीशी स्वतःचे तत्व कायम ठेवून जगण्यासाठी हे आशिर्वाद कामी येतात. संघर्षाची तमा न बाळगता सत्याची धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी कामाला येतात. कोणत्याही नात्याविना इतकं प्रेम कसं केलं, तुम्ही साहेबांच्यावर.. आणि काकणभर जास्त माझ्यावर.. नात्याविना प्रेम, माया, आपुलकी ही प्रेमाविना, आपुलकीविना असणा-या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही माझे गुरु, माऊली आणि तुम्हीच माझे लेकरं ! या १२ डिसेंबर ला एक संकल्प घ्यावा, म्हणते एक.. का? सोपा आणि साधा संकल्प, कराल का साध्य ? असे त्यांनी विचारले आहे.
Read Also :
- पळून गेलेल्या गुन्हेगाराला सुप्रीम कोर्ट अटकेपासून वारंवार संरक्षण का देताय? खासदार अरविंद सावंत
- पिंपरी-चिंचवडचा अभिमान ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’चे काम प्रगतीपथावर; आमदार महेश लांडगेंकडून कामाची पाहणी
- तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटना: १४ पैकी १३ प्रवाशांचा मृत्यू, मृतदेहांची डीएनए चाचणी होणार
- जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार-खासदारांमध्ये खडाजंगी; शिवसेनेतील अतर्गत वाद चव्हाट्यावर
- उपमहापौर व भाजप नगरसेवक राजेश काळे यांना दोन जिल्ह्यातून केले तडीपार